
मोदीजी हीच वेळ...शत्रूला ५६ इंच छाती दाखवण्याची आणि शहीदांच्या बलिदानाची किंमत चुकती करण्याची - रुपाली चाकणकर
- by Adarsh Maharashtra
- Jun 21, 2020
- 1644 views
चीनच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जायचे नसेल तर मोदीजी हीच वेळ आहे ५६ इंच छाती दाखवण्याची... बलिदानाचा बदला घेण्याची अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी सडेतोड सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. गलवान व्हॅलीमध्ये चीनने केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करतानाच शहीद झालेल्या जवानांना रुपालीताई चाकणकर यांनी श्रद्धांजली वाहिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०१४ पासून चीनला १८ वेळा म्हणजे सरासरी वर्षाला तीनवेळा जावून आले आहेत. इतक्या चकरा मारुन साध्य काय झालं असा सवालही रुपालीताई चाकणकर यांनी विचारला आहे. एकीकडे आत्मनिर्भर भारत या मुद्याला पुढे रेटत आपण 'व्होकल फॉर लोकल'ची संकल्पना जनतेसमोर मांडत स्वदेशी नारा दिला आणि मागील काही दिवसापूर्वीच १२ जूनला दिल्ली- मेरठ मेट्रोच्या कामात एल&टी या भारतीय कंपनीला डावलून चीनी 'शांघाय टनेल इंजिनिअरिंग कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलात? मग रेल्वे कुणाच्या अखत्यारीत आहे? केंद्राच्या म्हणजे आपल्याच ना??मग हा स्वदेशी अपनावो चा नारा कशासाठी ?? असा संतप्त सवालही रुपालीताई चाकणकर यांनी केला आहे.
एकीकडे चीन को लाल आख दिखानी चाहीये असं म्हणता आणि डोळे पांढरे होतील एवढी मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट या चीनलाच देता?? असं कसं चालेल आदरणीय मोदीजी? भारतीयांच्या भावनांशी खेळत माध्यमांना हाताशी पकडून मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करायचं आणि याच चीनच्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट द्यायची ही आम्हा भारतीयांसकट तुम्ही स्वतःची फसवणूक करता आहात असं नाही वाटत का आपल्याला??असाही प्रश्न रुपालीताई चाकणकर यांनी केला आहे.
कितीही छोटा मोठा शत्रू असला तरी स्वतःहून हल्ला करण्याची आपल्या भारताची परंपरा नाही पण कुणी हल्ला केला तर त्याला जशास तसं उत्तर देण्याची धमक मात्र भारतात नक्कीच आहे. आता ती वेळ आली आहे. आपल्या शहीद झालेल्या जवानांच्या बलिदानाचा बदला घेताना आपल्या ५६ इंच छातीत किती धमक आहे हे दाखवून देण्याची अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यांना जागृत करण्याचे कामही निवेदनात रुपालीताई चाकणकर यांनी केले आहे.
शेवटी रुपालीताई चाकणकर यांनी 'सौगंध मुझे इस मिट्टी की,मै देश नही मिटने दूंगा, मै देश नही झूकने दूंगा' या उक्तीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आठवण करून दिली आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम