
बँक ऑफ इंडियाला ५७ कोटीला गंडाप्रकरणी भाजपाचे नेते मोहित कंबोज यांच्यासह पाचजणां विरुद्ध गुन्हा दाखल सीबीआयची कारवाई
- by Adarsh Maharashtra
- Jun 18, 2020
- 358 views
मुंबई (प्रतिनिधी) : परदेशात निर्यात आणि व्यवसायाप्रकरणी बनावट कागदपत्रे बनवून बँक ऑफ इंडियाच्या फोर्ट येथील शाखेला तब्बल ५७.२६ कोटींचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी भाजपाचे मुंबई प्रदेश सरचिटणीस मोहित कंबोज- भारतीय यांच्यासह पाचजणांविरुद्ध केंद्रीय गुन्हा अन्वेषण शाखेने (सीबीआय ) गुन्हा दाखल केला आहे.
त्यांची कार्यालये व निवासस्थानी छापे टाकून कागदपत्रे व बँकचे दस्ताऐवज जप्त केले आहेत. त्याची छाननी सुरु असल्याचे सूत्रांच्याकडून सांगण्यात आले.
कंबोज कार्यकारी संचालक असलेल्या एका कंपनीसह दोन खासगी कंपनीच्या माध्यमातून ही फसवणूक करण्यात आली आहे. २०१३ ते २०१८ या कालावधीत बनावट दस्ताऐवजाद्वारे ही रक्कम उकळण्यात आल्याचे आतापर्यंतच्या तपासातून स्पष्ट झाले आहे.
जितेंद्र गुलशन कपूर, सिद्धात बाग्ला, इरतेश मिश्रा अशी गुन्हा दाखल असलेल्या अन्य संचालकांची नावे आहेत. त्याच्याशिवाय केबीजे हॉटेल्स गोवा प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कंबोज यांची बाग्ला ओव्हरसीस प्रायव्हेट कंपनी असून पूर्वी तिचे नाव अवियान ओव्हरसीज लिमिटेड कंपनी असे नाव होते.
या कंपनीच्या माध्यमातून कंबोज व त्याच्या साथीदारांनी बँक ऑफ इंडियाची दक्षिण मुंबईतील फोर्ट येथे कार्पोरट शाखेत व्यवहार सुरु केले. परदेशात मालाची निर्यात होते, त्याठिकाणी मोठे व्यवहार, तसेच देयके असून एफबी खरेदी केली जात असल्याचे त्यांनी बनावट कागदपत्रे सादर केली. त्याद्वारे ६० कोटीपर्यतच्या सुविधा मंजूर करून घेतल्या. २०१३ ते २०१८ पर्यंतच्या कालावधीत त्यांनी याप्रकारे बँकेची एकूण ५७ कोटी २६ लाखाची फसवणूक केली. बँकेच्या लेखा परीक्षणात हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर त्याविरुद्ध सीबीआयकडे तक्रार देण्यात आली.
या घोटाळ्यामध्ये बँकेचे काही अधिकारी व कर्मचारी गुंतले आहेत. त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारपासून सीबीआयच्या पथकाने कंबोज यांच्या वांद्रे (प )मधील पाली हिल येथील निवासस्थान, फोर्टमधील कार्यालय आणि अन्य संचालकाची घरे व कार्यालयावर छापेमारी केली. त्यातून विविध बँकेचे व्यवहार, कागदपत्रे जप्त केली आहेत. त्याची छाननी सुरु आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम