कर्जतमध्ये लाॅकडाऊन नंतर जमिनीचे भाव वाढणार!

“सेकंड होम” साठी मुंबईकरांसह पुणेकरही आग्रही! धनिकांची फार्महाऊसेस साठी चढाओढ होणार?

कर्जत(धर्मानंद गायकवाड):- देशात कोरोनाचे संकट आल्यानंतर सुरुवातीपासुन मुंबई आणि पुणे कोरोनाचा हिटलिस्टवर पाहावयास मिळाले आहेत. प्रंचड वेगाने या प्रगतीशील शहरांमध्ये कोरोना झपाट्याने वाढल्याने येथिल जनजीवन प्रंचड विस्कलीत झाले आहे. त्यामुळे उंच जीवनमानासाठी प्रसिद्ध असणारे मुंबई आणि पुण्यातुन या कोरोना संसर्गाचा भितीने अक्षरशा अनेकांनी पळ काढल्याचे दिसुन येत होते. त्यामुळे लाॅकडाऊन नंतर आपल्या सुरक्षिततेलासाठी आता सेकंड होम बनविण्याकरता मुबंई आणि इतरत्र छिकाणचे धनिक प्रंचड आग्रही होणार असल्याची माहीती मिळाली आहे. त्यामुळे सेकंड होम आणि फार्महाऊसेस करता प्रसिद्ध असणाऱ्या कर्जत तालुक्यांत लाॅक डाऊन नंतर जमिनीचे भाव पुन्हा गगनाला भिडणार असल्याचे व्यापारी वर्गातून समजले आहे 

नुकताच जगासंह देशात कोरोना व्हायरसचा संसर्गाने हाहाःकार उडवून दिल्यानंतर मुंबई आणि परीसरात भितीचे वातावरण पसरले होते. काही परप्रांतीय नागरीकांनी तर आपले धंदे व इतर व्यावसाय थेट बंद करुन आपले गावच गाठले. तर मुंबईतील अनेक धनिक व सामान्य जनता मुंबईतच अडकून पडली. यावेळी प्रत्येकजण कोरोना पासुन आपले संरक्षण करण्यासाठी सुरक्षित जागा शोधत होते. मात्र या कारोनाने जगण्यापेक्षा माणूसकी श्रेष्ठ नाही, याचे दर्शन घडविल्याने या कोरोना कालात अनेकांना नातेवाईकांचीही साथ मिळाली नसल्याचे चित्र पाहावयास मिळाले आहे. त्यामुळे आणीबाणीचा कालात सुरक्षित हक्काचे ठिकाणी असावे यासाठी आता लाॅक डाऊन नंतर अनेक मुंबई आणि इतरत्र ठिकाणचे धनिक फार्म हाऊस (सेकंड होम) बनविण्याचा विचारात असल्याचे मुंबईतील काही धनिकांकडुन समजते आहे.

विशेष म्हणजे यापुर्वीच कर्जत तालुक्यांतील विविघ भागात मुबंई आणि इतरत्र ठिकाणचा धनिकांनी मोठ मोठे अलिशान फार्महाऊसेस बनविले आहेत. या कोरोना कालात अनेक ठिकाणचा धनिकांना आपल्या कर्जत तालुक्यांतील विविघ सेकंड होमचा अधिक फायदा झाला आहे. त्यामुळे आता स्वसंरक्षणाकरता हक्काची जागा पाहीजे याकरता अनेक मध्यमवर्गीय व धनिक आग्रही झाले आहेत. त्यामुळे लाॅकडाऊन नंतर कर्जत तालुक्यांत धनिकांचा अधिक वावर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. परीणामी अनेक धनिक कर्जत तालुक्यांत आता जमिनी खरेदी करुन येथे सेकंड होम, फार्महाऊसेस उभारणार असल्याने कर्जतचा जमिनीचे भावा पुढील कालात अधिक वाढणार आहेत.
दरम्यान कर्जत तालुक्यांला फार्महाऊस ची संस्क्रुती आहे. कर्जतमधे अनेक ठिकांणचा शेकडो धनिकांचे सुसज्ज फार्म हाऊसेस आहेत. त्यामुळे फार्म हाऊसेस करता प्रसिद्ध असणाऱ्या कर्जत तालुक्यांकडे धनिकांचा अधिक कौल आहे. त्यामुळे लाॅकडाऊन कालात परिस्थितीती असतानाही स्वताची हक्काची जागा नसल्याने काही धनिकांना सेकंड होमचे महत्व पटले असल्याने आता अनेक धनिक लाॅकडाऊन नंतर थेट सेकंड होमचा मागे लागणार असल्याने कर्जत तालुक्यांत पुन्हा जमिनीचा खरेदी विक्री व्यवहारांना ऊत येणार असल्याने कर्जतकरांना पुन्हा सुगीचे दिवस येण्याची शक्यता नाकरता येत नाही.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट