लाॅकडाऊन कालात मदतीने उदरनिर्वाह पार पडला खरा, मात्र थेट पावसाळा सुरु झाल्याने उदरनिर्वाहाचा सवाल!

कर्जत(धर्मानंद गायकवाड)देशात कोरोनाचे संकट आल्याने गेल्या ३ महीन्यापासुन देश लाॅक डाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे देशासह रायगड जिल्हयातही सर्वसामान्य नागरीक घरातच होते, त्यानंतर अनेकांचा मदतीने उदरनिर्वाह पार पडला खरा, मात्र आता हातात रोजगार नसतानाच थेट पावसाळा सुरु झाल्याने, तसेच सर्व कामेधंदे बंदच असल्याने पुढे उदरनिर्वाह तरी कसा करायचा? असा सवाल काहींसमोर निर्माण झाला आहे.
देशात कोरोना संकट आल्याने येथे देशांत सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. असे असतानाच या लाॅक डाऊन कालात अनेक सेवाभावी संस्थांनी व काही राजकीय नेत्यांनी सामाजिक हीत जोपासत कर्जत तालुक्यांतील विविघ आदिवासी बांधव आणि गोरगरीब नागरीकांना जीवनावश्यक वस्तु वाटप करुन मदतीचा हात दिला आहे.
त्यामुळे लाॅक डाऊन कालात अनेकांचा उदरनिर्वाह पार पडला होता. मात्र आता लाॅक डाऊन शिथील झाल्यानंतर अनेकजण आता मदतीचा हात देण्यास पुढे येत नाहीत. तसेच निसर्ग चक्रि वादळानेही मोठे नुकसान विविध ठिकाणी झाल्याने काही जण उध्वस्त झाले आसतानाच पावसाळाही सुरु झाला आहे. त्यामुळे पावसाळयात विविघ उद्योग धंदे बंदच असण्याची शक्यता असल्याने आता उदरनिर्वाह कसा करायचा? असा भिषण सवाल अनेकांना भेडसावत आहे.
विशेष म्हणजे रायगडसह कर्जत तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर आदिवासी लोकसंख्या आहे, येथे कोणताही इंडर्स्टीज  झोन नसल्याने येथे हाताशी रोजगार नाही. परीेणामी मोलमजुरी करुन येथे अनेकजण उदरनिर्वाह करीत असतात. मात्र आता लाॅक डाऊन कालानंतर येथे सर्व कामधंदे व उद्योग बंदच असल्याने आता मोलमजुरी मिळणार नसल्याने उदरनिर्वाहाचे मोठे भिषण संकट काहींसमोर उभे ठाकले आहे. त्यातच आता लाॅक डाऊन कालात सुरुवातीचा कालात विविध शासकीय संस्था आणि नेत्यांनी मदतीचा हात दिला होता. त्यामुळे लाॅक डाऊनचे दिवस निघुन गेले होते. मात्र आता ना मदतीचे हात पुढे येतात ना शासकीय मदत, त्यामुळे आता मोठे संकट लोकांसमोर निर्माण झाले आहे.
दरम्यान कर्जत तालुक्यांतील काही राजकीय नेत्यांनी येथिल विविध आदिवासी बांधव आणि गोरगरीबांना भरभरून मदतीचा हात दिला आहे. कर्जत तालुक्यांत शासन, ग्रामपंचायती व काही शासकीय अधिकाऱ्यांनीही प्रंचड मदत विविघ ठीकाणचा नागरिकांना केली आहे. त्यामुळे लाॅक डाऊन कालात येथे अनेकांचा उदरनिर्वाह झाला आहे. मात्र आता लाॅक डाऊन शिथील झाल्याने आता रोजगारही हातात नसल्याने अनेकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यांत काहीसंमोर प्रंचड टेंशनचे वातावरण सुरु झाले आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट