
सध्या राज्यात 43 हजार 591 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू 3007 नव्या रुग्णांची नोंद उपचार घेऊन बरे 1924
- by Adarsh Maharashtra
- Jun 07, 2020
- 426 views
मुंबई : राज्यात आज 1924 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 39 हजार 314 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचा वेग राज्यात वाढताना दिसत आहे. आज कोरोनाच्या 3007 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 85 हजार 975 इतका झाला आहे. पैकी सध्या 43 हजार 591 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
आज झालेल्या मृत्यूपैकी 31 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहे. तर उर्वरित मृत्यू हे 13 मे ते 4 जून या कालावधीत आहे. या कालावधीत झालेल्या 60 मृत्यूपैकी मुंबई 44, उल्हासनगर 5, मीरा भाईंदर 4, सोलापूर 4, नाशिक 1, पालघर 1 आणि इतर राज्य 1 असे मृत्यू आहेत.
आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 5 लाख 51 हजार 647 नमुन्यांपैकी 85,975 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 58 हजार 463 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 28 हजार 504 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम