कर्जत मधील आदिवासींवर जीवघेणा हल्ला ; न्याय न मिळाल्यास जागृती कष्टकरी संघटना आंदोलन छेडणार

कर्जत. (धर्मानंद गायकवाड);- कर्जत शहरातील मुद्रे येथील आदिवासी वाडीत राहणाऱ्या आठ आदिवासी बांधवांवर याच गावातील सहा व्यक्तींनी लाठ्या,काठ्यांनी ,लोखंडी गजांनी बेदम मारहाण केली .या हल्ल्यात आदिवासी महिला व पुरुष गंभीर जखमी झाले आहेत . त्यांना कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले असून यामध्ये तिघांची प्रक्रुती गंभीर आहे . त्यांना एम जी एम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान  या आदिवासींना कायदेशीर योग्य न्याय न मिळाल्यास  कर्जत जागृती कष्टकरी संघटना आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या प्रमुख नॅन्सीताई गायकवाड यांनी दिला आहे .
 या बाबत पोलिस सुत्राकडुन मिळालेल्या माहीतीनुसार शुक्रवारी सायंकाळी निशा विलास पवार आणि तिचे कुटुंब बाहेर बसले असतांना याच परिसरात राहणार्रे अनंता मुसळे ,प्रथम कदम ,निलेश पवार आणी अन्य तीन आरोपीनी या आदिवासी बरोबर पूर्व वैमन्यशातुन भाडंण केले. काही वेळातच हा वाद विकोपाला गेला अन् आरोपींनी एकत्र जमून या आदिवासीवर काढ्या लाढ्या व लोख़डी गजांनी हल्ला केला .या हल्यात अनंता पवार याच्या डोक्याला जबर मार बसला. त्याच्या डोक्यातून रक्त प्रवाह सूरू झाला. तर शिवराम पवार याच्या हातावर आरोपीनी काठीच्या उपठ मारल्या, त्यामूळे शिवराम याच्या बोटाला जबर दुखापत झाली. तर काळूबाई हीच्याही डोक्याली गंभीर दुखापत झाली आहे. तसेच केशव पवार याच्या डोक्यावर, हातावर अगावर आरोपींनी लोख़डी गजाने मारहान केली.  या जीवघेण्या हल्यात एकूण आठ महिला व पूरूष आदिवासी गंभीर जखमी झाले असून या पैकी तीघाची प्रक्रती गंभीर असल्याने समजते. जखमांना पुढील उपचारासाठी एम जी एम हाँस्पिटल कामोठे येथे हलवण्यात आले आहे .
 दरम्यान जार्गत कष्टकरी संघटनेचे कार्यकर्ते वंसत पवार यानी उपविभागीय पोलीस आधिकारी अनील घेरडीकर याची भेट घेउन आरोपीना कडक शासन व्हावे अशी मागणी केली आहे. सदर आरोपीवर भादवी कलम 1860 अनूसार कलम 326, 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 तसेच अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतीबंधक अधिनियम 19893(2)(va) नूसार गून्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास कर्जतचे उपविभागीय पोलीस आधिकारी अनिल घेरडीकर करत आहेत .

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट