कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून एकदा तरी कार्यालयात हजर रहावं, अन्यथा पगार कपात

मुंबई, ५ जून:- चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसचा भारतातही फटका बसला आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या २ लाखांच्या वर पोहचली आहे. यात सर्वाधिक कोरोनाग्रस्त महाराष्ट्रात आहे. कोविड १९ चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सरकारकडून लॉकडाऊन सुरु करण्यात आलं. गेल्या २ महिन्यापासून लॉकडाऊन असल्याने अनेक व्यवसाय ठप्प पडले, तसेच शासकीय कार्यालयही ओस पडले.

सरकारी कर्मचाऱ्यांनी आठवड्याभरात कामावर रुजू व्हावं अन्यथा त्यांना पगारकपातीला सामोरं जावं लागेल असं ठाकरे सरकारने म्हटलं आहे. पीटीआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून एकदा कामावर रुजू व्हावं असे आदेश ठाकरे सरकारने दिले आहेत. ८ जूनपासून सरकारी कार्यालयं सुरु होणार आहेत. अशात आठवड्याभरातून एकदा कार्यालयात कर्मचाऱ्यांनी हजर रहावं असे आदेश ठाकरे सरकारने म्हटलं आहे.८ जूनपासून आदेशाची अंमलबजावणी होणार असून सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कार्यालयातील उपस्थितीबाबत महाराष्ट्र सरकारच्या वित्त विभागाने याबाबतचा आदेश काढला आहे. तसेच, कर्मचारी परस्पर गैरहजर राहिल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.प्रत्येक कर्मचाऱ्याला नियोजित दिवस देण्यात येणार आहे. त्यानुसार, ठरलेल्या दिवशी कर्मचारी कामावर आला नाही तर संबंधित कर्मचाऱ्याची त्या आठवड्याची गैरहजेरी लावण्यात येणार असून ती विनावेतन रजा समजली जाणार आहे. त्यामुळे या दिवसांचा पगार कर्मचाऱ्यांना मिळणार नाही. सरकारी कर्मचाऱ्यांनी शासकीय कामाप्रति निष्ठा ठेवणे अनिवार्य असून कार्यालयातील कामाचे कर्मचारी निहाय समन्वायी वाटप होणे आवश्यक आहे. त्यासाठी हे निर्देश दिल्याचे आदेशात म्हटले आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट