चक्रीवादळा नंतर कर्जत व नेरळचा वीज अभियंत्यांनी सिद्ध केली आपली कार्यक्षमता;वीज पुरवठा सुरु करणेचे प्रयत्न!

संपुर्ण तालुका अंधारात, मात्र काही ठिकाणी वीज सुरु!

कर्जत(धर्मानंद गायकवाड):- अरबी समुद्रात ठाणं मांडुण बसलेल्या निसर्ग चक्रीवादळाने नुकताच रायगडसह संपुर्ण कर्जत तालुक्याला प्रंचड झोडपले, कर्जत तालुक्यांतील विविध परीसरात प्रंचड नुकसान या चक्रीवादळाने केले आहे. अनेकांची घरे या चक्रीवादळात कोसळून अनेकजण येथे बेघर झाले आहेत, तर वीज वितरक कंपनीचेही विजेचे पोळही अनेक परीसरात जागेजागी कासळले आहेत. त्यामुळे संपुर्ण कर्जत तालुका अंधारात बुडाला होता. मात्र येथिल काही ठिकाणचे वीज वितरण कंपनीचे अभियंते व कर्मचारी यांनी कसरतीचे प्रयत्न करुन ३ तारखेलाच

मध्यरात्री नेरळसह काही ठिकाणचा वीज पुरवठा चालु करुन आपली कार्यक्षमता जनतेला दाखवुन दिली आहे. त्यामुळे या निसर्ग चक्रीवादळातील खरे योद्धा वीज अभियंते व वीज कर्मचारी ठरले आसल्याचे बोलले जात आहे. तर काही ठिकाणी अद्यापही वीज नसली तरीही या परीसरातही लवकरच वीज पुरवठा चालु करणार असल्याचा विश्वास वीज अभियंते व्यक्त करीत आहेत. तसे प्रयत्नही त्यांनी सुरु केले आसल्याची माहीती कर्जत उपविभागाचे उपअभियंता  श्री. घुळे यांनी यावेळी दिली आहे.

रायगड जिल्ह्यात येवुन धडकलेल्या चक्री वादळाने जिल्हा हादरून टाकला, कर्जत तालुक्यांपर्यंत हे चक्रीवादळ पोहोचले होते. कर्जत तालुक्यांतील कशेळे विभागासह कडाव परीसर व कर्जत शहरासह नेरळ परीसरात प्रंचड वादळी वाऱ्यासंह कोसळलेल्या चक्रीवादळाने अनेकांची घरे जमिनदोस्त झाली. तर कोणाच्या घरावरील छप्पर उडाले, शेकडो झाडे उन्मळून मुळासकट कोसळली, वीजेचा तारांसह वीजेचे पोल कोसळल्याने येथे वीजही गायब झाली होती. ३ तारखेला संध्याकाळी काहीशा प्रमाणात हे वादळ शमले होते. मात्र वीजपुरवठ्याचा प्रचंड गहन समस्या निर्माण झाली असतानाच आता ४/६ दिवस वीज येणार नाही अशी चर्चा रंगात आली होती. मात्र नेरळचे अभियंता श्री. भोईर व अन्य काही ठिकाणचे वीज कर्मचारी आणि कर्तव्यदक्ष अभियंते यांनी ही चर्चा खोटी ठरवित आपली काम करण्याची क्षमता दाखविली आहे.  काही ठिकाणी हे  चक्रीवादळ शमताच कर्जतचा काही भागांत वीज पुरवठा चालु झाल्याचे दिसुन आले. नेरळ शहरातील वीज अभियंता श्री. भोईर यांनी तर चार सहा तासातच काही भागांत वीज पुरवठा सुरलीत केला होता.

 विशेष म्हणजे कर्जत तालुक्यांतील जवळ जवळ सर्वच भागात वीजेचे पोल कोसळून महावितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. काही दुर्गम भागात तर अद्यापही वीज पुरवठा खंडीत आहे. मात्र मोठ्या कसरतीचे प्रयत्न वीज खात्याचे अभियंते व कर्मचारी करीत आहेत. येत्या काही तासातच ह्या दुर्गम भागातही वीजपुरवठा चालु होणार असल्याची माहीती वीज अभियंते देत आहेत. कर्जतचे वीज कार्यालयाचे उपविभागीय अभियंता श्री. घुळे साहेब याची पुर्ण टिम दिवसरात्र काम करीत असल्याचे दिसत असुन असल्या जीवघेण्या चक्रीवादळात वीज कार्यालयाचा मंडळीचा मेहनतीला अनेकांनी सलाम ठोकला आहे. कर्जतचा सर्व पक्षीय राजकीय मंडळी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी खास फोन करुन वीज कर्मचारी अभियंच्याचे कौतुक केले.

 दरम्यान कर्जत तालुक्यांतील नेरळचे ज्युनियर इंजिनीअर श्री. भोईर यांनी त्यांच रात्री वादळ शमताच नेरळ शहरातील बहुतांश भागात मध्यरात्री पर्यंत वीजेचा पुरवठा सुरळीत केला होता. नेरळ करांनी वीज इतक्यात लवकर येईन यांवर विश्वासच बसत नसताना नेरळ शहरात वीज चालु झाल्यानंतर कोणी भोईर यांचे प्रत्यक्ष भेटुन तर कोणी दुरध्वनी करुन त्यांचे अभिनंदन केले आहे. नेरळ उपविभाग २ चेही कर्मचारी आणि अभियंता यांनी वीजपुरवठा पुर्व्रवत चालु करणेसाठी जोरदार प्रयत्न सुरु  केले असुन लवकरच त्यांचा भागात वीज पुरवठा चालु होणार असल्याचे संकेत आहेत. वीज कर्मचारी आणि अभियंते यांचे कसरतीचे संपुर्ण तालुक्यांत विजपुरवठा चालु करणेचे प्रयत्न असल्याने लवकरच अंधारात डुबलेला काही परीसरात उजाला होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळ वीज कर्मचारी आणि अभियंते दिवसरात्र मेहनत घेताना दिसत आहेत. काही ठिकाणी मात्र वीजपुरवठा पुर्व्रवत सुरु आसल्याचे दिसुन येत आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट