राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 2560 ने वाढला , आज 916 रुग्णांना डिस्चार्ज .

राज्यातील एकूण रुग्णसंख्या 74,860 तर दिवसभरात सर्वाधिक 122 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू.

मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या तब्बल 2560 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 74,860 वर गेली आहे. या पैकी सध्या राज्यात  39,935 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. दरम्यान,आज राज्यात 122 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 2587 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 916 कोरोना बाधित रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा प्रमाण 43.18 टक्के आहे. राज्यातील मृत्यू दर 3.45 टक्के आहे.

आज झालेल्या मृत्यूपैकी 57 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहे. तर उर्वरित मृत्यू हे 30 एप्रिल ते 31 मे या कालावधीत आहे. या कालावधीत झालेल्या 65 मृत्यूपैकी मुंबई 30, सोलापूर 10, औरंगाबाद 6, नवी मुंबई 3, धुळे 3, जळगाव , कोल्हापूर, ठाण्यात प्रत्येकी 2, अहमदनगर, अकोला, नंदूरबार, पुणे, उल्हासनगर, वसई विरार येथील  एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 4 लाख 97 हजार 276 नमुन्यां पैकी 74,860 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 71 हजार 915 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 33 हजार 674 संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.

आज झालेल्या मृत्यूं 71 पुरुष तर 51 महिला आहेत. त्यातील 69 जण हे 60 वर्षापुढील आहे. 46 रुग्ण हे 40 ते 59   आहेत. 7 रुग्ण 40 वर्षाखालील आहे. 122 रुग्णांपैकी 88 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत.

महाराष्ट्र एकूण रूग्ण – 74,860

मृत्यू - 2587

मुंबई महानगरपालिका- 43, 492 (मृत्यू 1417)

ठाणे- 864 (मृत्यू 8)

ठाणे महानगरपालिका- 4188 (मृत्यू 85)

नवी मुंबई मनपा- 3001 (मृत्यू 74)

कल्याण डोंबिवली- 1444 (मृत्यू 27)

उल्हासनगर मनपा - 406 (मृत्यू 9)

भिवंडी, निजामपूर - 199 (मृत्यू 7)

मिरा-भाईंदर- 763 (मृत्यू 30)

पालघर- 171 (मृत्यू 3 )

वसई- विरार- 1028 (मृत्यू 31)

रायगड- 673 (मृत्यू 26)

पनवेल- 565 (मृत्यू 25)

नाशिक - 177

नाशिक मनपा- 216(मृत्यू 10)

मालेगाव मनपा - 762 (मृत्यू 58)

अहमदनगर- 128(मृत्यू 7)

अहमदनगर मनपा - 37 (मृत्यू 1)

धुळे - 53 (मृत्यू 10)

धुळे मनपा - 124 (मृत्यू 10)

जळगाव- 577(मृत्यू 65)

जळगाव मनपा- 204 (मृत्यू 9)

नंदुरबार - 37 (मृत्यू 4)

पुणे- 571 (मृत्यू 13)

पुणे मनपा- 7390 (मृत्यू 343)

पिंपरी-चिंचवड मनपा- 502 (मृत्यू 11)

सातारा- 564 (मृत्यू 22)

सोलापूर- 59 (मृत्यू 5)

सोलापूर मनपा- 973 (मृत्यू 80)

कोल्हापूर- 513 (मृत्यू 6)

कोल्हापूर मनपा- 94

सांगली- 113 (मृत्यू 3)

सांगली, मिरज, कुपवाड मनपा- 13 (मृत्यू 1)

सिंधुदुर्ग- 78

रत्नागिरी- 314 (मृत्यू 5)

औरंगाबाद - 44 (मृत्यू 1)

औरंगाबाद मनपा - 1609 (मृत्यू 83)

जालना- 154 (मृत्यू 2)

हिंगोली- 193

परभणी- 51 (मृत्यू 1)

परभणी मनपा-22

लातूर -98 (मृत्यू 3)

लातूर मनपा- 27

उस्मानाबाद-91(मृत्यू 2)

बीड - 49 (मृत्यू 1)

नांदेड - 30

नांदेड मनपा - 105 (मृत्यू 6)

अकोला - 46 (मृत्यू 6)

अकोला मनपा- 601 (मृत्यू 27)

अमरावती- 17 (मृत्यू 2)

अमरावती मनपा- 244(मृत्यू 14)

यवतमाळ- 148 (मृत्यू 1)

बुलढाणा - 74 (मृत्यू 3)

वाशिम - 8

नागपूर- 39

नागपूर मनपा - 596 (मृत्यू 11)

वर्धा - 9 (मृत्यू 1)

भंडारा - 37

चंद्रपूर -17

चंद्रपूर मनपा - 10

गोंदिया - 66

गडचिरोली- 39

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट