२५ तोळे सोने व १५ लाख हुंडा मागणाऱ्या कल्याण आणि नवी मुंबई येथिल ५ जणांवर नेरळ पोलिसात गुन्हा दाखल!

कर्जत(धर्मानंद गायकवाड):- रायगड जिल्ह्यातील नेरळ शहरातील एका सुशिक्षीत मुलीसोबत साखरपुड्याचा कार्यक्रम झाल्यानंतर हुंड्याची मागणी करणाऱ्या नवरदेव श्रींकात प्रल्हाद राठोड, त्याचे वडील प्रल्हाद बुधा राठोड, आई आशा प्रल्हाद राठोड, तसेच मुलाची मावशी सरला आर. राठोड व तिचा नवरा आर. जी राठोड या ५ जणांवर नेरळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेची जोरदार चर्चा नेरळ परीसरात सुरु असुन हुंड्याची मागणी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी महीलां संघटनाकडुन केली जात आहे. 

या बाबत नेरळ पोलिस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार, नेरळ येथिल एका तरुणीचा विवाह कल्याण येथिल प्रल्हाद बुधा राठोड यांचा मुलगा श्रींकात प्रल्हाद राठोड यांच्यासोबत ठरला होता. यावेळी दिनांक १५ मार्च रोजी श्रींकांत आणि या तरुणीचा साखरपुड्याचा कार्यक्रमही पार पडला होता, मात्र साखरपुड्यातच श्रीकांत यांच्या घरच्यांनी जेवणास नकार दिला, त्यावेळी मुलीचे मामा व वडील यांनी मुलाच्या घरच्यांना जेवत का नाहीत, असे विचारले असता येथे मुलाचा आईने मुलीचा कुटुंबियांना सांगितले की, माझा मुलगा श्रीकांत हा चांगल्या पदावर नोकरीला असल्याने आम्हाला आताचा आता १५ लाख रुपये हुंडा द्या, तसेच लग्नाचा दिवशी मुलीचा अंगावर २५ तोळे सोने घाला तरच हे लग्न होईन अन्यथा नाही, त्यामुळे मुलीचे मामा आणि वडिलांचा पाचाखालची वाळूच सरकली. यावेळी कसेबसे मुलीचा मामांनी आणि वडिलांनी त्यांच दिवशी प्रयत्न करुन रक्कम रुपये २०१०००/- (दोन लाख १ हजार रुपये) स्रीधन दिले. त्यावेळी मामला थंडही झाला.

विशेष म्हणजे त्यानंतर २१ मार्च २०२०रोजी श्रीकांत हा सदर तरुणी काम करीत असलेल्या नवी मुंबई ऐरोली येथिल कामाचा ठिकाणी पोहोचला, त्यावेळी या तरुणीस नवीमुंबई येथिल नेरळ येथे घरी सोडण्यासाठी हा निघाला असता त्याने या तरुणीस उर्वरीत पैशांचे काय झाले? असा सवाल केला. मात्र ही तरुणी सुशिक्षीत असल्याने हे चांगले वाटते का? आपण सुशिक्षीत आहोत असे सांगत श्रीकांत यास या तरुणीने समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मात्र श्रीकांत संतापला आणि त्याने या तरुणीस जर माझ्या आईची अपेक्षा पुर्ण होणार नसेन तर हे लग्न होणार नाही, असे थेटच सांगुन टाकले, त्यामुळे ही तरुणी प्रंचड घाबरुन गेली. त्यानंतर या तरुणीचा मानसिक छळ श्रीकांतने केला आसल्साचे तिने तक्रारीत म्हंटले आहे.

त्यानंतर सदर सर्व घडलेला प्रकार या तरुणीने आपल्या आईवडीलांसमोर कथन केला असता तिच्या कुटुबांने हुंडा देण्यास नकार दिला असता श्रींकात याच्या घरच्यांनी या तरुणीचा घरच्यांचे काॅल ला उत्तर देणेच बंद केले. अखेर या तरुणीचे मामांनी मध्यस्थ असणारे काशिनाथ पवार व अर्जुन राठोड यांच्या मार्फत श्रीकांत च्या घरच्यांशी संपर्क साधला. त्यावेळी श्रींकात व त्याचा घरच्यांनी लग्न करणेस साफ नकार दिला. तसेच तरुणीचा कुटुंबियाकडुन घेतलेले रोख रक्कम तसेच अंगठी व कपड्यांचे पैसेही देण्यास नकार देवुन या तरुणीची व तिच्या कुटुंबियांची फसवणुक केल्याचेही तक्रारीत म्हंटले आहे. 

दरम्यान श्रींकात राठोड व त्याचा कुटुंबिय यांनी या तरुणीचा कुटुंबियांकडे रोख १५ लाॅक रुपये व २५ तोळे सोन्याची मागणी करुन तो हुंडा देण्यास तरुणीचा कुटुंबीयांनी नकार दिल्याने त्याकारणावरुन या तरुणी सोबत साखरपुडा झाला असताना देखील लग्ल करण्यास नकार दिला. तसेच या तरुणीची बदनामी करुन या तरुणीस शिवीगाळ व दमदाटी करुन साखरपुड्यात झालेला खर्च तसेच लग्नाकरता ॲडवान्स दिलेला सर्व खर्च असे एकुण ८,१०,६५८/- (आठ लाख दहा हजार सहाशे अठ्ठावन्न रुपये) परत करण्यास नकार देवुन या तरुणीचा कुटुंबियांची अन्यायाने विश्वास घात करुन फसवणुक केल्याने या तरुणीने नेरळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

नेरळ पोलिस ठाण्यात नुकताच या प्रकरणी गुन्हा रजि नंबर ७१/२०२० नुसार भादवि कलम ४२०, ४०६, ५००, ५०४, ५०६, ३४, ४ अन्वये मुलगा श्रीकांत प्रल्हाद राठोड, मुलाचे वडील प्रल्हाद बुधा राठोड, मुलाची आई आशा प्रल्हाद राठोड , सर्व राहाणार रा. अ/ ५०२, दुर्गा हाईटस, लोकसेवा नगर, चक्की नाका, कल्याण, पुर्व, तसेच मावशी सरला आर. राठोड व आर. जी. राठोड, रा. ऐरोली, नवी मुंबई यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. तर यापुर्वीही श्रींकात व त्याचा कुटुंबींयांनी जळगांव येथिल पाथर्डी येथिल एका कुटुंबाची अशीच फसवणुक केल्याचे या तरुणाीने केलेल्या तक्रारीत म्हंटले आहे. त्यामुळे अशा समाजविरोधी क्रुत्य करणाऱ्या कुटुंबावर कठोर कारवाई करण्यात येणेची मागणी काही महीला सामाजसेविकांकडुन केली जाते.


रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट