मुलुंडच्या शिधावाटप दुकानात राज्य सरकारने फक्त ५० टक्केच धान्य पाठविल्याचा आमदार मिहीर कोटेचा यांचा आरोप.

मुलुंड :(शेखर चंद्रकांत भोसले) मुलुंडच्या शिधावाटप दुकानांना फक्त ५० टक्केच धान्य पुरविण्यात आले असल्यामुळे गरीब व गरजू लोकांचे हाल होत आहेत, असे सांगत मुलुंडचे स्थानिक आमदार मिहीर कोटेचा यांनी हा मुद्दा उपस्थित करत गरिबांना न्याय देण्यासाठी लवकरच उच्च न्यायालयात सरकारच्या विरोधात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले.


कोरोनामुळे रोजगार बंद आहे, हाताला काम मिळत नाही आहे त्यातच शिधापत्रिका धारकांना रेशनच्या दुकानात धान्य मिळत नसल्यामुळे मुलुंडमधील अनेक गरीबांना, हातावर पोट असणाऱ्या गरिबांना दोन वेळचे जेवण पोटभर मिळत नाही आहे. शिधावाटप दुकानात पुरेसे धान्य येत नसल्याचे शिधावाटप केंद्र चालकांचे म्हणणे असून सरकारकडून अपुरा धान्यपुरवठा होत असल्याने सर्व रेशन कार्ड धारकांना धान्य देता येत नाही आहे असे हे केंद्र चालक कार्डधारकांना सांगत असल्याची बातमी आमदार मिहीर कोटेचा यांच्यापर्यंत पोहचली. केंद्राकडून आलेले धान्य जेव्हा नागरिकांना मिळाले नाही तेव्हा आमदार कोटेचा यांनी या प्रकरणाची चौकशी केली. त्याला अनुसरून शिधावाटप अधिकाऱ्यांकडून यादी घेण्यात आली. त्या यादीनुसार लोकांना कमी धान्य दिल्याचे समोर आले आहे.


यावर आमदार मिहीर कोटेचा यांनी हे प्रकरण उच्च न्यायालयात घेवून जाणार असल्याचे सांगून यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे असे सांगितले. या याचिकेद्वारे ते राज्यसरकारकडून कमी धान्यपुरवठय़ाबद्दल उत्तर मागणार आहेत. 'एकीकडे राज्य सरकारने जनहित याचिकेत एफिडेविट दिले आहे की, राज्य सरकार गरीबांना धान्य देत आहे तर दुसरीकडे मे महिना संपत आला तरीही मे महिन्याच्या कोट्यातील ५० टक्के सुध्दा धान्य सरकार कडून मिळाले नाही आहे', असे आमदार मिहीर कोटेचा यांनी सांग

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट