मुलुंड येथील कोरोना उपचार केंद्रासाठी डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची प्रतिक्षा

मुलुंड :(शेखर चंद्रकांत भोसले) कोरोनाच्या फैलावामुळे मुलुंडमधील कोरोना बाधितांच्या संख्येने ७०० चा टप्पा ओलांडला असून पालिकेच्या टी वार्डच्या आरोग्य विभागातील अनेक कर्मचारी व अधिकारी देखील कोरोना सांगर्गिक झाले आहेत. त्यांच्यावर उपचार चालू असून जे बरे झाले आहेत ते घरातच क्वॉरंटाईन आहेत. यामुळे मुलुंड पश्चिम येथील जकातनाक्यावर नव्याने उभ्या राहात असलेल्या १२५ बेडच्या कोविड उपचार केंद्रासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे. येथे काम करण्यासाठी डॉक्टर्स व इतर स्टाफ मिळत नसल्यामुळे येथील कोविड उपचार केंद्र सुरू होण्यास अडचण येत आहे. 


तसेच मुलुंड पूर्व येथील मिठागर रोड येथील कोविड उपचार केंद्र पूर्णपणे भरले असून सध्या तेथे १९८ रुग्ण उपचार घेत आहेत त्यामुळे मुलुंड परिसरातील नव्याने दाखल होणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत असल्याने येथील उपचार केंद्रात १०० अतिरिक्त बेड लावण्याची योजना आहे परंतु सद्यस्थितीत येथे फक्त एकच डॉक्टर व मोजक्याच नर्सेस व इतर वैद्यकीय स्टाफ उपलब्ध असल्यामुळे येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांचेच हाल होत आहेत त्यामुळे नव्याने १०० बेडची सुविधा उपलब्ध केली तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची व डॉक्टरांची अधिक कमतरता जाणवणार आहे व दाखल होणाऱ्या रुग्णांकडे व्यवस्थित लक्ष देण्यासाठी व देखरेख करण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी वर्ग अपुरा पडणार आहे. त्यामुळे सध्यातरी ही योजना बासनात गुंडाळण्यात आली आहे.

मुलुंडमध्ये सध्या मिठागर रोड येथील पालिकेच्या शाळेत तथा मुलुंड पश्चिम येथील फोर्टिस रुग्णालय येथे कोरोनावर उपचार केले जात असून रिद्धि-सिद्धी अपार्टमेंट, नाहुर येथील सेनरूफ क्वॉरंटाईन सेंटर येथे नागरिकांसाठी आयसोलेशनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मुलुंड पश्चिमेच्या एमटी अग्रवाल मनपा रुग्णालय व मुलुंड पूर्वेतील वीर सावरकर रुग्णालयात कोरोणाची स्क्रीनिन्ग आणि स्वब टेस्ट केली जात आहे. तर जकातनाक्यावरील १२५ बेडचे कोविड उपचार केंद्र बनवून तयार असून डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्षेत आहे आणि रिचर्डसन अँड क्रुडास कंपनीच्या मोकळ्या मैदानात १८०० बेडचे नवीन कोरोना उपचार केंद्र आकारात येत आहे

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट