
चेंबूर येथील विष्णू नगर परिसरातील क्वॉरोनटाईन केंद्राची दुरवस्था!
- by Adarsh Maharashtra
- Jun 01, 2020
- 797 views
मुंबई ( जीवन तांबे ) क्वॉरोनटाईन ठेवण्याकरिता जागा कमी पडत असल्याने पालिका मिळेल त्या जागेत विलीगिकरण कक्ष उभारत आहे. चेंबूर येथील विष्णू नगर परिसरातील प्रकल्प बाधिता करिता बांधण्यात आलेल्या कित्येक वर्षे पडीक असलेल्या ईमारती मध्ये विलीगिकरण कक्ष उभारला आहे. मात्र या इमारतींची फारच दुरवस्था झाल्याने विलीगिकरण कक्षात असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मुंबई शहरात कोरोनांने थैमान घातले आहे. या कोरोनाची अनेक नागरिकांना लागण झालेली आहे. त्यामुळे पालिकासह इतर कामगारांवर मोठा दिवसेंदिवस ताण पडत आहे. घरातील एका व्यक्तीला कोरोना बाधित आढळल्यानंतर त्याच्या घरातील कुटुंबियांना विलीगिकरण कक्षात ठेवावे लागत आहे. सुरुवातीला पालिकेने शहरातील अनेक हॉटेल ताब्यात घेऊन विलीगिकरण कक्ष तयार होते. मात्र दिवसेंदिवस रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची संख्या वाढतच असल्याने, हे हॉटेल देखील सध्या कमी पडू लागले आहेत. त्यामुळे पालिकेने सध्या अनेक ठिकाणी अनेक वर्षे पडीक असलेल्या इमारती ताब्यात घेतल्या असून यामध्ये त्यांनी विलीगिकरण कक्ष उभे केले आहेत.
चेंबूर परिसरात एम पश्चिम, पूर्व विभागात मोठ्या संख्येने करोनाचे रुग्ण वाढत आढळत असल्याने, त्यांच्या नातेवाईकांसाठी पालिकेने विष्णू नगर येथे असलेल्या काही पडीक इमारतींमध्ये विलीगिकरण कक्ष उभे केले आहेत. या इमारतीची कित्येक साफसफाई केली नसल्याने त्यांची मोठी दुरवस्था झालेली आहे. कंत्रादारामार्फत या इमारती तात्पुरती साफसफाई करून, या इमारतींचा ताबा पालिकेला दिला आहे. मात्र याठिकाणी मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य असून पिण्याच्या पाण्याची सोय नाही. तसेच शौचालय देखील पूर्णपणे खराब झाले असून विलीगिकरण कक्षात ठेवलेल्याना घाणीत राहावे लागत आहे. याबाबत अनेकदा संबंधित अधिकाऱ्यां कडे तक्रारी केल्या आहेत. मात्र त्यांच्या कडून काहीही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप विलीगिकरण कक्षात असलेल्या एका व्यक्तीने केला आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम