मुंबईत कोरोना विषाणूचा आकडा 40 हजारच्या उंबरठ्यावर, कोणत्या विभागात किती रुग्ण?

मुंबई : मुंबईत कोरोना विषाणूचा आकडा 40 हजारच्या उंबरठ्यावर पोहोचला  आहे. काल दिवसभरात 1 हजार 244 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 39 हजार 686 वर पोहोचली आहे. तर मुंबईत 52 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 1 हजार 279 वर पोहोचला आहे.

मुंबई हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. मुंबईतील धारावी परिसरात कोरोनाचे रुग्ण हे दिवसेंदिवस वाढत आहेत. मुंबईतील जवळपास 6 वॉर्डात जवळपास 2 हजारपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत. यात धारावी, माहिम, माटुंगा, दादर या परिसरांसह इतर परिसरांचा समावेश आहे.

मुंबईतील वॉर्डनिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी 

2 हजारपेक्षा जास्त रुग्ण असलेले वॉर्ड

जी उत्तर वॉर्ड – धारावी, माहीम, दादर : 2728

ई वॉर्ड – भायखळा, नागपाडा, माझगाव : 2438

एफ उत्तर वॉर्ड – माटुंगा किंग सर्कल : 2377

एल वॉर्ड – कुर्ला : 2321

एच पूर्व वॉर्ड – बांद्रा, सांताक्रुझ पूर्व : 2094

के पश्चिम वॉर्ड – अंधेरी पश्चिम : 2049

तर 2 हजारपेक्षा कमी रुग्ण असलेले वॉर्ड

जी दक्षिण – वरळी, प्रभादेवी, एल्फिन्स्टन : 1905

के पूर्व – अंधेरी पूर्व : 1875

एम पूर्व – गोवंडी, मानखुर्द : 1696

एफ दक्षिण – परेल दादर पूर्व : 1648

एन वॉर्ड – घाटकोपर : 1525

एस वॉर्ड – विक्रोळी, भांडुप नाहूर : 1278

आर उत्तर – दहिसर -309

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट