
कोरोनाचा पेशंटच हरवला, जबाबदार कोण? भाजपा प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमैया यांचा सवाल
- by Adarsh Maharashtra
- May 31, 2020
- 1248 views
मुंबईतल्या केईएम रुग्णालयातली आणखी एक धक्कादायक बाब समोर आली असून एक 70 वर्षीय कोरोना रुग्ण हरवला आहे. व्हेंटिलेटवर असलेला हा रुग्ण हरविणे गंभीर बाब असून त्याला जबाबदार कोण, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमैया यांनी केला.
म्हणाले की, लालबाग, जीजामातानगर येथे राहणारे एक 70 वर्षांचे रुग्ण 14 मे ला रुग्णालयात दाखल झाले. 18 मे 2020 ला अचानक तब्येत खालवल्यामुळे त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आले आणि व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. 19 मे ला सकाळी नातेवाईकांना सांगण्यात आले की आपला पेशंट वॉर्डमधून हरवला आहे. यानंतर 21 मे ला दोन दिवसांनी एक मृतदेह दाखवत तो त्या रुग्णाचा असल्याचे दर्शवले. मात्र तो त्यांचा मृतदेह नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले. 10 दिवस झाले, आजपर्यंत त्या रुग्णाचा तपास सुरु आहे, ते कुठे आहेत हे कोणालाच माहित नाही.
एकीकडे कोरोनाबाधितांना उपचार कसे मिळणार याची चिंता असतानाच दुसरीकडे आता रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या सगळ्याला जबाबदार कोण, याचे उत्तर रुग्णालय प्रशासनाला मात्र अद्याप सापडलेले नाही. रुग्ण कसा काय हरवला ? व्हेटिलेटरवर असलेला रुग्ण पळून तर जाऊ शकत नाही, मग याला जबाबदार कोण असा सवाल भाजपचे उपाध्यक्ष किरीट सोमैया यांनी केला आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम