
कोरोना रुग्णालयात अपुऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यामुळे रुग्णांच्या मृत्यूची तक्रार भाजपा प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमैया यांची चौकशीची मागणी
- by Adarsh Maharashtra
- May 30, 2020
- 392 views
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना ऑक्सिजनचा पुरवठा करणारी यंत्रणा कमी पडत असून अपुऱ्या ऑक्सिजनमुळे जोगेश्वरी येथील रुग्णालयात बाराजणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची चौकशी करावी तसेच वाढती रुग्णसंख्या ध्यानात घेऊन ऑक्सिजन पुरवठ्याची सुविधा अधिक बळकट करावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमैया यांनी शनिवारी केले.
मा. किरीट सोमैया म्हणाले की, मुंबईत महापालिकेच्या कोरोना रुग्णालयांत ऑक्सिजनचा कमी आणि सदोष पुरवठा झाल्याने रुग्णांचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र समोर येत आहे. कोरोनाबाधितांना मोठ्या प्रमाणात होणारा श्वसनाचा त्रास आणि अपुऱ्या ऑक्सिजनमुळे रुग्णांचे मृत्यू झाल्याचे आणखी एक वास्तव समोर आले आहे. जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे मनपा रुग्णालय (जे आता कोविड रुग्णालय आहे) तिथे गेल्या दोन आठवड्यात 12 जणांचा मृत्यू झाला आहे, असे आपल्याला सांगण्यात आले. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांचे मृत्यू झाले असतील तर या जोगेश्वरीतील या प्रकऱणाची चौकशी करावी अशी मागणी आपण आयसीएमआर आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
ते म्हणाले की, मुंबईतील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची क्षमता तेवढीच होती पण रुग्णांची संख्या वाढली आहे. यापुढे ही स्थिती अजून गंभीर होईल कदाचित येत्या दोन महिन्यात नवीन रुग्णसंख्या ही 80 हजार ते 1 लाखापर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे यापुढील काळातही हजारो पेशंटला ऑक्सिजनची/व्हेंटिलेटर्सची गरज पडणार आहे. हे ध्यानात घेऊन महापालिकेच्या सर्वच कोविड रुग्णालयात व्हेंटिलेटर्समध्ये ऑक्सिजनची क्षमता वाढण्यासाठी पाऊले उचलावी लागणार आहे. व्हेंटिलेटर्ससाठी प्रशासनाकडे कोणती व्यवस्था आहे, याचा तातडीने खुलासा करण्यात यावा. तसेच जर रुग्णांचे मृत्यू व्हेंटिलेटर्स मधील कमी ऑक्सिजन पुरवठ्यामुळे झाले असतील तर त्यांची क्षमता का वाढवण्यात आली नाहीत, याचाही खुलासा करण्यात यावा.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम