नातेवाईक सांगतात, “नका येवु, तिकडेच थांबा”! कर्जतमध्ये जो-तो स्वताचाच जीव सांभाळतोय!

कोरोना भितीने माणुसकी संपत चालली!

कर्जत(धर्मानंद गायकवाड):- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका तिसऱ्या लाॅकडाऊन पर्यंत सुरक्षित तालुका होता. येथे कोरोनाचे रुग्णही नव्हते, मात्र चौथ्या लाॅकडाऊन मध्ये कर्जतमधे २७ जणांची कोरोना चाचाणी पाॅझीटीव्ह आल्याने प्रंचड खळबळ माजली आहे. दरम्यान ईकडे येवु नका, तिकडेच थांबा, सुरक्षित राहा, सुरक्षित राहु द्या, असा सल्लाही कर्जत मधुन अनेकजण आपल्या नातेवाईंकांना देत आसुन जो तो आपला स्वताचाच जीव सांभाळत आहे. त्यामुळे कोरोनाचा भितीने माणुसकी संपत चालल्याची जोरदार चर्चा सर्वत्र सुरु आहे.
 कर्जत तालुक्यांत सुरुवातीची काळात कोरोना नसल्याने अनेकांना कर्जत सुरक्षित वाटत असल्याने काहींचे कर्जतमधे येणेची तयारी सुरु होती. मात्र कर्जत तालुक्यांत आता अचानक कोरोनाचे रुग्ण वाढल्याने कर्जतही आता असुरक्षित झाले आहे. कर्जतमधे येणेची तयारी करणाऱ्यांना कर्जतमधील अनेक नातेवाईकांनी अनेक जवळचा नातेवाईकांना आहे तेथेच थांबा, कर्जतला येण्याची घाई करु नका, स्वताची काळजी घ्या असे सल्ले देणेस सुरुवात केली असल्याचे अनेकांकडून समजते आहे.
देशात कोरोनाचे संकट आल्याने सुरुवातीचा काळातील लाॅकडाऊन प्रंचड कडेकोट होता. नागरीकांना बाहेर फिरण्यास सुद्धा येथे मनाई करणेत आली होती. कडक सिमा बंद करण्यात आल्या आहेत. असे असतानाच ४ मे रोजी लाॅक डाऊन थोडा शिथिल करण्यात आल्यानंतर नागरीक किरकोळ किरकोळ कामासाठी बाहेर पडु लागले, तर काही मुंबई व अन्यत्र ठिकाणावरुन कर्जत, माथेरान येथे पोहोचले. काहींनी तर येथे कोरोना सोबतच आणला. आणि कर्जतला ग्रहण लागले. त्यानंतर कर्जत, नेरळ, माथेरान शहरात एका पाठोपाठ एक कोरोना बाधित रुग्ण सापडले. अनेकजण क्वारंटाईन झाले. आणि कर्जतकरांचेही डोळे उघडले. कर्जतमधील नागरीक पुन्हा एकदा सतर्क झाले आहेत. बाहेरुन येणाऱ्यांना मज्जाव घालीत आहेत. त्यामुले आता कोरोनाची साखली तोडण्याचे जोरदार प्रयत्न येथे प्रशासन आणि जनतेने सुरु केले आहेत.
विशेष म्हणजे वशेलीबाजी करीत कर्जतमधे इतरत्र ठिकाणचे नागरीक येत असल्याचा तक्रारी करण्यात येत होत्या. येथे दारु खरेदीसाठीही कर्जतबाहेरुन लोक कर्जत तालुक्यांत येत होते. त्यामुळे कर्जत तालुक्यांत कोरोना झपाट्याने वाढला आहे. मात्र आता कर्जत बाहेरुन कर्जतमधे कोरोना घुसल्याची शंका कर्जतकरांना आली आहे. त्यामुळे आता कर्जतकर स्वता कर्जत बाहेरील लोकांना कर्जत तालुक्यांत न येण्याचा सल्ला देत आहेत. आहे तेथेच थांबा, कर्जत असुरक्षित होत चालले आहे, असे सांगतानाच जो तो आपली स्वःताची सुरक्षा महत्वाची समजत असल्याचे चित्र कर्जत तालुक्यांत दिसत आहे.
दरम्यान कर्जत तालुक्यांत कोरोना रुग्णांचा संख्या अधिक वाढल्याने येथे एकच हाहाःकार माजला आहे. तसेच कर्जत तालुक्यांत आता बाहेरुन येणाऱ्यां पासुन सारेच सावध झाले आहेत. त्यामुळे कर्जत तालुक्यांतील नागरीक आता आपल्या संबंधांतील लोकांना व नातेवाईकांना कर्जत तालुक्यांत न येण्याचा सल्ला देत आहेत. आहे तेथेच थांबा, सुरक्षित राहा, आणि सुरक्षित राहु द्या, अशी भावना येथे कर्जत करांची झाली असल्साचे सांगणेत येत आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट