
विमा लागू करण्याची मागणी मान्य केल्याने चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेकडून शासनाचे स्वागत
भाऊसाहेब पठाण यांच्या पाठपुराव्याला यश
- by Adarsh Maharashtra
- May 29, 2020
- 2094 views
कोरोना संकटात सेवा कर्तव्य बजावणा-या राज्य शासनाच्या चतुर्थश्रेणी कर्मचा-यांना तातडीने विमा कवच व सानुग्रह सहाय्य लागू करण्यात यावे, ही राज्य सरकारी गट ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाची मागणी शासनाने मान्य केली असून या निर्णयाबद्दल संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मुख्य सचिव तसेच संबंधित विभागाचे अधिकारी, शासनाचे आभार मानले आहे.
याबाबतचा अध्यादेश शासनाने जारी केला असून त्यानुसार कर्तव्य बजावत असताना कोविड ग्रस्त झाल्यास त्या कर्मचा-यास उपचाराचा खर्च म्हणून ५० लक्ष इतके विमा कवच असेल व मृत्यू झाल्यास ५० लक्ष सानुग्रह सहाय्य दिले जाईल. ही योजना ३० सप्टेंबर २०२० पर्यंत लागू असेल, असे या अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे. अध्यादेश क्रमांक संकीर्ण २०२०-प्र.क्र.४-व्यय ९ दिनांक २९ मे २०२० नुसार आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचा-यांबरोबच अन्य कर्मचारी जसे की जिल्हा प्रशासन, पोलिस, होमगार्ड, आंगणवाडी कर्मचारी, लेखा व कोषागरे, अन्न व नागरी पुरवठा, पाणी पुरवठा व स्वच्छता, घरोघरी सर्वेक्षणासाठी नेमलेले अन्य विभागाचे कर्मचारी यांनाही हे संरक्षण लागू करण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या वतीने कोरोना संकटाचा सामना करताना चतुर्थश्रेणी कर्मचा-यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे तसेच त्यांच्या कामात अधिक जोखीमदेखील आहे. त्यामुळे त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा, यासाठी संघटनेच्या वतीने सुरूवातीपासून पत्रव्यवहार, निवेदनं आदी पातळ्यांवर शासनाकडे मागणी करून त्याचा पाठपुरावा करण्यात आला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच मुख्य सचिव, संबंधित संचालक आदींकडे याचा पाठपुरावा केला होता. अखेर या प्रयत्नाला यश आल्यामुळे त्याचा उपयोग चतुर्थश्रेणी कर्मचा-यांना होईल तसेच शासनानेही मागणी मान्य केल्याबद्दल संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी सर्वांना धन्यवाद दिले आहे तसेच या कोरोना संकटातून लवकरच राज्य मुक्त व्हावे, आणि त्यासाठी चतुर्थश्रेणी कर्मचारी अहोरात्र मेहनत अधिक जोमाने करतील, अशा सदिच्छा आणि विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम