
श्री स्वामी समर्थ सामाजिक संस्थेमार्फत रोज ३००० गोरगरिबांना मोफत अन्नदान
- by Adarsh Maharashtra
- May 29, 2020
- 1323 views
मुलुंड :(शेखर चंद्रकांत भोसले) मुलुंड मधील श्री स्वामी समर्थ सामाजिक संस्था लॉकडाऊन सुरू झाल्यापासूनच्या गेल्या ६५ दिवसांत रोज ३००० गोरगरिबांना, मजुरांना जेवणाच्या पॅकेटचे वाटप करत असून मुलुंड पूर्व-पश्चिम, भांडूप येथील मजुरांना व गरजुना सकाळ व संध्याकाळ मोफत अन्न या संस्थेचे अध्यक्ष संजय माळी यांच्यामार्फत देण्यात येत आहे.
स्वामींचा आशीर्वाद, काही दानशूर व्यक्तींचे सहकार्य व श्री स्वामी समर्थ सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांचे पाठबळ यामुळेच गेले ६५ दिवस आम्ही गोरगरिबांना अन्नाचे पॅकेट वाटप करण्यात यशस्वी झालो असून लॉकडाऊन संपेपर्यंत आमचे हे सामाजिक कार्य असेच चालू राहणार असल्याचे श्री स्वामी समर्थ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय माळी यांनी सांगितले.
आरोग्याची संपूर्ण काळजी घेत, पूर्णतः स्वच्छता राखत मुलुंड पश्चिम येथील चंदनबाग हॉल मध्ये हे अन्न बनविण्यात येत असून एकूण ४० कर्मचारी जेवण बनविणे, जेवण पॅकेटमध्ये जेवण भरणे व नंतर पॅकेट्स पॅक करण्याच्या कामासाठी रोज राबत आहेत. संजय माळी यां सर्व कर्मचाऱ्यांना रोजचे मानधन देतात. येथून ही अन्नाची पाकिटे पालिका कार्यालय, पोलिस स्टेशन, अग्निशमन दल, स्लम वसाहती, रस्त्यावरील गोरगरीब, मजूर यांना वाटण्यात येत असून सकाळी साधारण २२५० व संध्याकाळी ७५० जणांना रोज अन्नदान केले जात आहे.
'मुलुंडमधील इतर सामाजिक संस्थादेखील आमच्या संस्थेकडून अन्नाची पाकिटे मोफत घेवून जावून गोरगरिबांना वाटत आहेत. कोरोनाच्या या कठीण काळात गोरगरिबांचे व ज्यांचे हातावर पोट आहे अश्या मजुरांचे अतोनात हाल होत आहेत म्हणून श्री स्वामी समर्थ सामाजिक संस्थेने गोरगरिबांना मोफत जेवण देवून सामाजिक कार्य करण्याचा निश्चय केला व गेल्या ६५ दिवसांपासून हा मोफत अन्नदानाचा सामाजिक उपक्रम कोणताही खंड पडू न देता राबवित आलो आहोत. गोरगरिबांना अन्नदान केल्यावर त्यांना होणारा आनंद व त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारे हसू यामुळे आमच्या मनाला देखील खूप समाधान मिळत आहे, असे मनोगत अध्यक्ष संजय माळी यांनी व्यक्त केले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम