
1600 कामगार अखेर तामिळनाडूकडे रवाना!
मध्य रेल्वेच्या ढिसाळ कारभारामुळे धास्तावलेल्या कामगारांना अखेर दिलासा!
- by Adarsh Maharashtra
- May 27, 2020
- 1071 views
मुंबई ( जीवन तांबे ) मुंबईहून तामिळनाडूकडे रवाना होणाऱ्या सुमारे 1600 मजुरांना, रेल्वेच्या ढिसाळ व्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. अखेर खासदार परिवहन मंत्री यांच्या मध्यस्तीनंतर या मजुरांना दिलासा मिळाला आहे. दिवसभराच्या गदारोळा नंतर अखेर तामिळनाडूकडे रवाना झाले आहेत.
मुंबईत रोजंदारीचे काम करणारे तामिळनाडूमधील सुमारे 1600 मजदूर लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकले. रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारच्या नियमानुसार, या मजदूरांनी मुंबईहून तामिळनाडू येथे जाण्यासाठी, 'महाराष्ट्र स्टेट तामिळ संघम'च्या माध्यमातून रीतसर अर्ज केला होता. यानुसार मध्य रेल्वेच्या वतीने 26 मे रोजी सकाळी 11.30 वाजता 'मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस' येथून 'मुंबई- तामिळनाडू' विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात आली. मात्र, या ट्रेनने प्रवास करू इच्छिणाऱ्या मजुरांना केवळ तासभर आधीच रेल्वेच्या वतीने या विशेष ट्रेनबाबत माहिती देण्यात आली. मुंबई शहर आणि उपनगरांत राहणाऱ्या या मजुरांना केवळ तासाभरात सीएसटी स्थानक गाठणे शक्य नव्हते. आपली ट्रेन आता हुकणार किंवा रद्द होणार या भीतीने हे मजूर गोंधळून गेले. त्यांनी खासदार राहुल शेवाळे यांच्याशी संपर्क साधला आणि मदत करण्याची विनंती केली. खासदार शेवाळे यांनी परिवहन मंत्री आणि रेल्वे मंत्रालयाशी संपर्क साधून संबधित विशेष ट्रेनची, 11.30 ची वेळ संध्याकाळी 5 वाजताची करण्याची विनंती केली, जेणेकरून सर्व मजुरांना ही ट्रेन पकडणे शक्य होईल. खासदार शेवाळे यांच्या विनंतीमुळे अखेर ही ट्रेन सांयकाळी 5.30 वाजता सीएसटी येथून तामिळनाडूकडे रवाना झाली आणि मजुरांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम