
जिथं कमी तिथं आम्ही ही भूमिका सार्थ ठरविणारे समाजसेवक दिपक सावंत..!
- by Adarsh Maharashtra
- May 27, 2020
- 704 views
सध्या कोरोना या विषाणू ने अवघ्या महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला नामोहरम करुन सोडले आहे असे असताना देखील आपल्या जिवाची पर्वा न करता केवळ समाजकार्य हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून निरपेक्ष आणि निस्वार्थ भावनेने कार्य करणारे समाजसेवक दिपक सावंत यांना आणित्यांच्या कार्याला त्रिवार सलाम. त्यांनी आतापर्यँय विविध संघटनांच्या माध्यमातुन विविधांगी कार्य करत कोरोना संकटात सतत माणुसकीचा हात देत सुमारे १५०० हुन अधिक लोकांना मदतीचा हात दिला. काही लोकांना धान्य स्वरूपात गहू तांदूळ तेल डाळ शेंगदाणे तसेच दैनंदिन जीवनात लागणारे साबण तेल कोलगेट असे मदत कार्य करुन ५० दिवस चालेल इतका शिधा उपलब्ध करुन दिला. आयुष्य सुंदर फाउंडेशन व सिंहगर्जना युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने गरीब आणि गरजुना सातत्याने अन्नदान होत आहे ही आनंदाची बाब आहे. मदत कार्य करताना अनेक चांगले वाईट अनुभव आले. खरी परिस्थिती कळाली अनेकांचे रोजगार गेले काहींना मास्क विक्रीसाठी रोजगार ही उपलब्ध करून दिले अंध, अपंग, तृतीयपंथी, गरजू , अनेक लोकांना मदत सुपूर्त केली. कामगिरी करत असताना नाशिक पालकमंत्री मा श्री छगन भुजबळ, खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती, खासदार मा श्री हेमंत गोडसे, नाशिक आयुक्त राधाकृष्ण गमे सरांचे देखील कृतज्ञता पत्र प्रशस्तीपत्र आले कार्यास बळ मिळाले. अजूनही काम जोमाने चालु आहे जिथं कमी तिथं आम्ही भूमिका घेऊन हाक मारा मदत तयार आहे या संकल्पनेने आयुष्य सुंदर फाउंडेशन काम करत आहे. आयुष्य सुंदर फाऊंडेशन
चे अध्यक्ष दिपक विजय सावंत यांच्या कार्यप्रणालीस आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम