
चित्रीकरण सुरू करण्यापूर्वी या बाबींचा विचार व्हावा...!
- by Adarsh Maharashtra
- May 27, 2020
- 680 views
मुंबई- (महेश्वर तेटांबे )
१) शुटींग दरम्यान कुणी करोनाबाधीत झाल्यास त्याचा आर्थिक आणि कायदेशीर फटका निर्माता यांना बसू नये.
२) तंत्रज्ञ / कामगार यांची उपस्थिती खूप प्रमाणात कमी करू नये. (कामाची खरी आवश्यकता स्पाॅट बाॅईज, लाईट्समन, आर्ट कामगार, ड्रेसमन, मेकअपमन, अटेण्डट अशा कामगारांना आहे)
३) चॅनेल कडून निर्माता यांना ६०% रक्कम प्रती एपिसोड अॅडव्हान्स मिळावी.
४) कमीत कमी कलाकार घेऊनच शुटींग करावे.
५) निर्माता यांच्यावर करोना प्रतिरोधक उपाय करण्यावर अतिरिक्त खर्च पडणार असल्याने कलाकार / मुख्य तंत्रज्ञ यांनी मानधन कमी घ्यावे.
६) शुटींग फक्त दहा तासच करावे.
७) जेवणातील मेनू कमी करून खर्च वाचवावा.
८) ज्या मालिकांचे शुटींग फिल्मसिटी मध्ये सेट उभारून करत आहेत त्यांचे कोवीड १९ महामारीमुळे शुटींग बंद आहे त्यांचे भाडे संपूर्ण माफ करावे तसेच शुटींग सुरू केल्यास पुढील दोन महिने भाडे घेऊ नये.
९) ओटीटी प्लॅटफॉर्म यांनी कमीतकमी हमी रक्कम देऊन येईल तो चित्रपट त्यांच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर कमिशनवर प्रदर्शित करण्यास प्राधान्य द्यावे आणि चित्रकर्मी यांना सहकार्य करावे.
१०) करोना (कोवीड १९) महामारीच्या संकटकाळी टिव्ही चॅनेल्स यांनी निर्माता यांच्या मदतीकरीता एक वर्ष मुदतीवर चित्रपट नाॅन एक्स्लुसिव्ह पध्दतीने त्वरित घ्यावेत.
११) महाराष्ट्र शासन कडे अनुदान योजनेंतर्गत सादर झालेल्या चित्रपटांचे परिक्षण न करता सरसकट प्रत्येक चित्रपटास ₹ ३५ लाख अनुदान त्वरित हस्तांतरित करावे.
टिव्ही / ओटीटी / युट्यूब या माध्यमा व्यतिरीक्त चित्रपट शुटींग करणे शक्य होईल असे वाटत नाही कारण चित्रपटगृह कधी सुरू होतील तसेच फिजीकल डिस्टन्स नियमांमुळे रसिक प्रेक्षकांचा थिएटर मध्ये चित्रपट पहायला किती व कसा प्रतिसाद मिळतो याबद्दल प्रश्नच आहे.
काहीही उपाय करून निर्माता यांच्या मानसिकता आणि आर्थिक कुचंबणा याचाच प्रामुख्याने विचार व्हावा.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम