राष्ट्रपतीनी नरेंद्र मोदीचे सरकार बरखास्त करावं-राजाराम खरात

मुंबई: कोरोना प्रसार रोखण्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना अपयश आले असून त्यांच्या विविध चुकीच्या निर्णयानं कोरोना व्हायरसचा अधिक फैलाव झाला आणि त्याची सजा सर्व भारत देश भोगतोय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री पदाचा ताबडतोब राजीनामा द्यावा किंवा राष्ट्रपतीनी मोदीचं सरकार बरखास्त करावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आर.के) चे पक्षाध्यक्ष मा.राजाराम खरात यांनी केली.

 दि.२२ मार्च २०२० रोजी जनता कर्फ्यू लावून सायंकाळी लोकांना टाळ्या वाजविण्यास प्रवृत्त केले त्यामुळे हजारो भा.ज.प समर्थकांनी टाळ्या,डबडे वाजविलेच परंतू अनेकांनी फटाकेही फोडले.देशावर आपत्ती असताना असा निर्णय घेणे हे जनतेच्या जिवितांस धोका दायक ठरु शकते. किंबहुना कोरोनाचा प्रसार होण्यास काही अंशी निश्चितच हातभार लागलेला आहे.

 तसेच अनेक देशात कोरोनाचा फैलाव झाला असताना २४ मार्च २०२० रोजी गुजरात मध्ये लाखो लोकांनच्या उपस्थितीत अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समवेत *" नमस्ते ट्रम्प"* कार्यक्रम घेण्यात आला.त्यामुळे या व्हायरसचा प्रसार झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 दि.२५ मार्च २०२० पासून देशभर टाळेबंदी जाहीर करून अचानक घेतलेल्या हया चुकिच्या निर्णायाने लाखो नागरीक हवालदिल होउन भीतीपोटी आपआपल्या गावाकडे पायी निघाले त्यामुळे अनेक नागरिकांना पराकोटीच्या यातना सहन कराव्या लागला अनेकांचे मृत्यू झाले. 

दि.५ एप्रिल २०२० रोजी संपूर्ण भारत देशात विजेचे दिवे बंद करुन तेलाचे दिवे,मेनबत्या,व मोबाईल लाईट लावण्याचे आपले आवाहन अत्यंत चुकीचे होते. त्यामुळे कोरोना व्हायरस गेला नाहीच परंतु कोरोना विरुद्ध सक्रिय कार्य करणाऱ्या, डाँक्टर, नर्स, आया,वाँर्ड बाँय,सफाई कामगार, पोलिसांसह सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचा अपमान केला आहे.

 दि.३ मे २०२० रोजी तसेच कोरोनाचा वाढता प्रसार अनेक नागरीक मृत्यूमुखी पडत असताना लष्कराने हाँस्पीटलवर विमानातून पुष्पवृष्टी करणे. हाँस्पीटल मधील मेडिकल स्टाफला गरजेच्या वस्तू देणे महत्त्वाचे असताना असा चुकिचा निर्णय कां घेतला जातोय?

नरेंद्र मोदींच्या हातून अधिक जनतेला अडचणीत टाकण्याचे निर्णय होउ शकतात म्हणून महामहिम राष्ट्रपतीनी मोंदीचा राजीनामा घेऊन कोरोना व्हायरसची लढाई यशस्वी करण्यासाठी निर्णय घ्यावा. 

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट