आयुष्य सुंदर फाउंडेशन व सिंहगर्जना युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने अन्नदानातून घडत आहे माणुसकीचे दर्शन...

डोंबिवली :कोरोना संकटात माणुसकीचे दर्शन घडते आहे. अनेक महाराष्ट्रातील भारतातील सेवाभावी संस्था ह्या गरजूं पर्यंत अन्नधान्य स्वरूपात शिधा पोहचवत आहे. तसेच जेवण देखील पूर्वत आहे. नाशिक व डोंबिवलीत देखील   आयुष्य सुंदर फाउंडेशन व सिंहगर्जना युवा मंच   यांच्या संयुक्त विद्यमाने अन्नदान होत आहे. लॉकडाउन मध्ये अनेक कुटुंबाची हालाखीची परिस्थिती झाली आहे. गरीब,मध्यमवर्गीय अडचणीत आले असतांना माणुसकीचा हात म्हणून आम्ही सम्पूर्ण डोंबिवली व नाशिक शहरात अन्नधान्य स्वरूपात मदत पूर्वत आहोत. सदर २८ मार्च २०२० पासून मदत कार्य आम्ही चालू केलं त्यानंतर अनेक संपर्कात असणारी मित्र मंडळी,नातेवाईक मदतीसाठी रोज सहकार्य करत रोज १०० ते १५० किलो दरम्यान धान्य हे गहू, तांदूळ,डाळ, तेल, बिस्किटं, साखर, तिखट, मीठ , मसाला , दूध,  फळे तसेच दैनंदिन जीवनातील लागणाऱ्या साबण, तेल, कोलगेट ही वाटप चालू आहे. त्यात गरजू गरीब, सामान्य कुटुंब, तृतीयपंथी, अनेक कुटुंब तसेच मूक प्राणी कुत्र, मांजर, गाय, बैल, म्हेस,शेळी, बकरी, मोर यांना देखील चारा,  बिस्किटं, धान्य , दुध, पाणी स्वरूपात अन्नसेवा चालू आहे.



सुरुवातीच्या लॉकडाऊन काळात २८ मार्च ते ११ एप्रिल रोज ६० ते ८० कुटुंबापर्यंत ही संस्था कार्यरत होती. त्यानंतर १२ एप्रिल ते २५ एप्रिल मध्ये कमीत कमी ३० ते ४० कुटुंब पर्यंत मदत कार्य पोहोचते झाले.. काही दिवस अनेकांना रेशन मिळत आहे. सर्व चौकशी करून ज्यांच्या कडे रेशन कार्ड नाही अशा सामान्य घरात अत्यंत गरज आहे. अशाच ठिकाणी मदत पोहचवत आहोत. आता आकडा आजून कमी केला आहे. लॉकडाउनच्या तिसऱ्या  काळात सध्या २० ते ३५ कुटुंब दरम्यान मदत डोंबिवली व नाशिक मध्ये पोहचवत आहे. 
साधारण नाशिक मधील गरीब, सामान्य, तृतीयपंथी, वर्तमान, विक्रेते, अंध , अपंग, मूकबधिर, कलाकार, टॅक्सी चालक ,रिक्षा चालक ,बिगारी कामगार, १५००+ कुटुंबा पर्यंत धान्य पोहचवण्यात आज महिन्याभरात सर्व मित्र मंडळींनी केलेली मदत सहकार्याने आजवर  आपल्याच बांधवांची सेवा करू शकलो. आजूनही करत आहोत. आजून ज्यांना मदत केली अशा काही लोकांची दिलेलं धान्य पण संपलं असून रोज अनेक कॉल्स येतात. जेवढं शक्य असेल तेवढी मदत नक्की करत राहू...आजूनही मदत रोज मित्रांच्या सहकार्याने येत आहे.

या आधी अनेक आलेल्या संकटाला आमच्या संस्थेने पुढाकार घेऊन मदत कार्य विविध उपक्रमाद्वारे केले आहे. यापुढेही करत राहू मदतीचे हात सहकार्य करणारे हे दुसरं कोणी नसून आमचे सर्व मित्र मंडळी नातेवाईक आहेत रोज मदत न सांगता येऊन पोहचते. हे देवकार्य आहे, हे शिवकार्य आहे. हे आपल्या हातून घडत यात आम्ही स्वतला भाग्यशाली मानतो व ही मदतकार्य नसून हे कर्तव्य कार्य आहे.. असे संस्थेचे अध्यक्ष  दिपक  सावंत यांनी सांगितलं.यात झुंजारपणे काम करणारी  प्रितम भामरे,अक्षय जोशी, हर्षल पालवे, कुणाल , तेजस ,दादू वाजे, उमेश, चेतन, महेश ,सागर पुराणिक, सागर पवार,राहुल परदेशी, संतोष गुप्ता,अक्षय शाहू,प्रितेश, सचिन भरत, आदित्य,किरण आंबेकर , उमेश आचार्य,अनुजा भावे, अंकिता ढिकले, प्रियांका धोंडगे, श्रुती ढगे, प्रसाद जाधव ,अक्षय हेगडे , अमित सोमवंशी, निशांत, देवा देशपांडे या सर्वांनी संकटात केलेलं सहकार्य अमूल्य आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट