कोरोनाचे सदोष रिपोर्ट देणाऱ्या थायरोकेयरवर बंदी. पुर्नचाचणीत पॉजिटिव्ह बनले निगेटिव्ह कठोर कारवाईची मागणी.

वसई : आजारी व्यक्तीला त्याच्या आजाराचे अचूक निदान करून पुढील वैद्यकीय उपचार देण्यासाठी महत्वाची भूमिका पॅथोलॉजी लॅब पार पाडत असते. मागील काही वर्षात त्यांची विश्वासहर्ताही संपुष्टात आली आहे. असे असताना कोरोनाच्या काळातही पैसे कमवण्या साठी थेट चुकीचे रिपोर्ट सादर करून रुग्णाची तसेच महानगरपालिकेची फसवणूक करणाऱ्या थायरोकेयर या लॅबवर निर्बंध आणले आहेत. 

इतकीच कारवाई पुरेशी आहे का? हा या निमित्ताने उपस्थित झालेला प्रश्न आहे. अश्या लॅबवर कायमस्वरूपी बंदी आणून फौजदारी कारवाई करणे आवश्यक आहे. वसई विरार शहर मनपा हद्दित कोरोना संक्रमित रुग्णाचे , संशयितांचे नमूने घेऊन अहवाल देण्याचे काम वसई मधे ६ विविध लॅबना देण्यात आले होते. त्यापैकी थायरोकेयर ही एक आहे. 

मात्र सदर लॅबने नियोजित वेळेत रुग्णाचे अहवाल सादर केले नाहीत. त्याकरता ७२ तासांपेक्षा जास्त विलंब केला. शिवाय रुग्णाचे रिपोर्टही चुकीचे दिलेले आहेत. सदर रुग्ण निगेटिव्ह असतानाही त्यांचे रिपोर्ट पॉजिटिव्ह दिल्याची धक्कादायक बाब उघड़कीस आलेली आहे. याच रुग्णाचे पुन्हा नव्याने नमूने घेऊन शासकीय लॅबमधे तपासले असता निगेटिव्ह आलेले आहेत. 

त्यांमुळे आयुक्त गंगाथरन यांनी तात्काळ या लॅबच्या तपासणीवर बंदी घालून सदर ठिकाणी कोरोना संशयित व्यक्तिना तपासले जाऊ नये असे लेखी आदेश पारित केलेले आहेत. थायरोकेअर या प्रयोग शाळेतून तपासणी केल्यानंतर अनेक करोना संशयीत रुग्णांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत मात्र शासकीय लॅब मध्ये तपासणी केली असता ते अहवाल निगेटिव्ह आल्याचे आढळले. असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी तबस्सूम काझी यांनी दिली. 

यातील मुख्य मुद्दा यानंतर सुरु होणार आहे. पालिकेने बंदी आणली असली तरी या लॅब मधून अनेकांना निगेटिव्ह रिपोर्ट ही दिले असणार. त्याची पुन्हा पड़ताळणी होणे आता आवश्यक झालेले आहे. सदोष असलेल्या सदर लॅबच्या चुकीमुळे एखादी व्यक्ती याच सदोष रिपोर्ट च्या आधारे निश्चित होऊन घरी परतली असेल. प्रत्यक्षात ती व्यक्ती पॉजिटिव्ह असण्याची शक्यता आहे. त्यांमुळे सदर लॅब मधून अश्या व्यक्तिचे नाव पत्ते घेऊन , मागील काही दिवसात कोविड १९ च्या झालेल्या टेस्ट, त्यांचे निगेटिव्ह रिपोर्ट पुन्हा तपासून घेणे आवश्यक झालेले आहे. 

याबरोबरच सदोष रिपोर्टमुळे नागरिकांना झालेला मनस्ताप, रोगाच्या भीतीने झालेली कमकुवत मनस्थिती, त्यांच्या कुटूंबावर झालेला विपरीत परिणाम याबाबत पालिका कुठली कारवाई करणार आहे? असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. अश्या लॅबवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.  सदर लॅब मधे नागरिकांनी कोविड १९ च्या टेस्ट करू नये असे आवाहन पालिके मार्फ़त करण्यात आलेले आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट