
मान्सूनपूर्व कामे अजूनही अपूर्णावस्थेत मुंबईत पुरसदृश परिस्तिथी निर्माण होण्याचा धोका पालिकेचे दुर्लक्ष-रवी राजा यांचा आरोप
- by Adarsh Maharashtra
- May 23, 2020
- 825 views
मुंबई :(प्रतिनिधी) पावसाळा तोंडावर आला असताना महापालिके तर्फे केली जाणारी नालेसफाईची कामे अपूर्ण असल्याचा आरोप आज विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला तर काही कामे अजूनही सुरू झाली नसल्याचा व बऱ्याच कामांचा दर्जा हा निकृष्ट असल्याचा आरोप ही त्यांनी केला आहे त्यामुळे यंदा ही मुंबईत पाणी साचून पुरसदृश परिस्थिती निर्माण होईल असा त्यांनी इशारा दिला. ते पुढे म्हणाले की पावसाळ्यापूर्वी मुख्य व लहान रस्त्यांवरील झाडाच्या फांद्या तोडण्यात येतात मात्र अजूनही ही कामे सुरू करण्यात आलेली नाहीत दरवर्षी या फांद्या पडून माणसे मरतात अथवा जखमी होतात अर्थसंकल्पात तरतूद असूनही याकडे पालिका दुर्लक्ष करत आहे व जनतेच्या जीवाशी खेळत आहे स्त्यांच्या खाली असणाऱ्या गटारांच्या मेनहॉल वर जाळी असणे आवश्यक असते मात्र अर्ध्याधिक ठिकाणी या जाळ्या बसविल्या नसल्याने पावसाळ्यात एखाद्या अपघाताची वाट पालिका बघत आहे का असा सवालही त्यांनी केला आहे.मुख्य व लहान रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी स्थायी समितीत करोडो रुपये मंजूर झाले आहेत मात्र बऱ्याच ठिकाणी अजूनही कामे अपूर्णावस्थेत आहेत तर काही ठिकाणी कामे अजूनही करण्यात आलेली नाहीत त्यामळे तेथील स्थानिक नागरिक व वाहनचालकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे काही ठिकाणी रस्त्यांची कामे ही अत्यंत निकृष्ठपणे झालेली असल्याने जनतेच्या पैशांचा अपव्यय झालेला असल्याचा आरोप ही त्यांनी केला.दरवर्षी मुंबई व उपनगरातील छोट्या व मोठ्या नाल्यातून गाळ काढण्याचे काम मे महिन्यात पूर्ण करण्यात येते ही नाले सफाई झाल्याचा दावा पालिका प्रशासन फक्त कागदोपत्री दाखवत असते मात्र आता मे महिना संपण्यास ही आला तरी नालेसफाईची ही कामे अजून अर्धीही झाली नाहीत परिणामी या वर्षी मुंबईत नाले सफाई न झाल्याने पुरसदृश्य परिस्तिथी निर्माण होईल अशी भीती ही त्यांनी व्यक्त केली ही परिस्तिथी लक्षात घेता ही नागरी कामे लवकर पूर्ण करावीत व मुंबईकरांची गैरसोय टाळावी म्हणून आयुक्तांनी स्वतः लक्ष घालावे अशी आपण पत्राद्वारे मागणी केल्याचेही रवी राजा यांनी सांगितले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम