
परप्रांतीय मजूर गावी गेल्याने मजूर कुठून आणायचे? बांधकाम व्यावसायीक चिंतेत; अनेक कामे रखडणार!
- by Adarsh Maharashtra
- May 20, 2020
- 894 views
कर्जत(धर्मानंद गायकवाड):- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यांतीलही अनेक मजूर कोरोना भितीने गावी गेले आहेत. त्यामुळे कामासाठी मजूर आणायचे कोठून या चिंतेत आता बांधकाम व्यावसायीक सापडले आहेत. त्यामुळे आता लाॅकडाऊन संपला तरी कामे ठप्पच राहतील असा अंदाज वर्तविला जात आहे.
देशावर कोरोना संकट आल्यानंतर देश लाॅक डाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व उद्योग धंदे अनेक दिवस बंद झाले होते. त्यामुळे परप्रांतीय लोकांचे प्रंचड हाल झाले. त्यानंतर अनेक परप्रांतीय मंडळी भाडेतत्वावर येथे राहत असल्याने व रोजगार नसल्याने घराचे भाडेही चढत होते. त्यामुळ कित्येक परप्रांतीय नागरिकांनी आपल्या मुळ गावी जाणे पसंत केले आहे. मिळेल ते वाहन पकडुन आणि वाट्टेल त्या परिस्थितीत अखेर परप्रांतीयांनी गाव गाठले आहे. त्यामुळ अनेक परप्रांतीय नागरीक गावाला पोहोचले. मात्र आला देशासह महाराष्ट्रातही झोन सिस्टम लागु होवुन त्यातील बिगर रेड झोन मध्ये काही व्यावहार सुरुही झाले आहेत.
विशेष म्हणजे पावसाळा तोंडावर आला असतानाच काही बांधकामे व इतर व्यावसायही सुरु झाले आहेत. मात्र या काही व्यावसायासाठी बऱ्याच ठिकाणी मजुर मिळत नसल्याची बोंब सुरु झाली आहे. तर स्थानिक मजुर परप्रांतीयांचा तोडीचे काम करीत नाहीत. त्यामुळे बांधकाम व काही अन्य व्यावसायीकांसमोर मोठे आवाहन उभे ठाकले आहे. बरेच व्यावसायातील काही कामे ही परप्रांतीय लोकांवर अवळंबुन असल्याने आता ही कामे करायची कसा? असा प्रश्न अनेक व्यावसाय करणाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे परप्रांतीय नागरीक कधी राज्यात व रायगडात येतील आणि कामे करतील याचा काहीच नेम नसल्याने अनेकांचे व्यावसाय कोरोनाने चांगलेच संकटात सापडले आहेत.
दरम्यान विविघ दुधाचे धंदे पीयुपीचे धंदे, वाॅटर प्रुफींग, सेट्रींग यासारखे अनेक विविध धंद्यात स्थानिक कमी प्रमाणात आहेत. त्यामुळे हे धंदे कसे चालणार? याबाबत सारेच चिंतेत सापडले आहेत. तर महाराष्ट्रात उद्योग धंदे सुरु होण्याच्या वाटेवर असल्याची खबर मिळताच परप्रांतीय नागरीक ट्रेन सुरु होताच ईकडे येणार असल्याचे काही व्यावसायिकांना या परप्रांतीय नागरीकांनी कळविले आहे. त्यामुळे हे परप्रातींय नागरीक पुन्हा ईकडे येणार असल्याने काही धंदे काही काळच संकटात राहणार असल्याचे समजते आहे. मात्र सध्या कोरोनाचा पार्दुर्भाव वाढत असतानाच पावसाळाही तोंडावर आला असतानाच काही तातडीची कामे कशी करायची? कोठून मजुर आणायचे? असा भिषण सवाल काही व्यावसायीकांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक कामे रखडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम