लॉकडाऊनच्या काळात ३९८ गुन्हे दाखल २१२ लोकांना अटक

पुणे ग्रामीण मध्ये नवीन गुन्हा

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक  गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने  कठोर पाऊले उचलली असून राज्यात ३९८ गुन्हे दाखल केले आहेत.अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली.

 टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर  चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात 

महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण ३९८ गुन्ह्यांची (ज्यापैकी १८ N.C आहेत) नोंद १८ मे २०२० पर्यंत झाली आहे. 

           गुन्ह्यांचे विश्लेषण

या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १६९ गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १५७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ,tiktok विडिओ शेअर प्रकरणी १८ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ७ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी ४३ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत २१२ आरोपींना अटक केली आहे .तर यापैकी १०२ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे 

            पुणे ग्रामीण

 पुणे ग्रामीण पोलीस अंतर्गत पौंड पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे त्यामुळे जिल्ह्यातील नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या ३१ वर गेली आहे सदर गुन्ह्यातील आरोपीने 

कोरोना महामारीला धार्मिकतेचा  रंग देणारी  पोस्ट आपल्या फेसबुक अकाऊंट शेअर केली होती.

त्यामुळे परिसरातील शांतता बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता. 

ऑनलाईन व्यवहारात सावध राहा

सध्या लॉकडाउनच्या काळात काही उपहारगृहे, हॉटेल ऑनलाईन ऑर्डर घेत असून त्याचे बिल सुद्धा ऑनलाईन भरण्यास सांगत आहेत.महाराष्ट्र सायबर विभागामार्फत आवाहन करण्यात येते की, लोकांनी ऑनलाइन व्यवहारापासून सावध रहावे. काही सायबर भामटे मोठ्या हॉटेलच्या नावाने बोगस वेबसाईट बनवून लोकांना लुबाडत आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या ऑर्डर देताना संबंधित वेबसाईट ही त्या हॉटेलची अधिकृत वेबसाईट आहे, याची खात्री करावी आणि मग नंतर द्यावी. ऑनलाईन ऑर्डर देताना जर कोणती वेबसाईट तुम्हाला तुमच्या डेबिट ,क्रेडिट कार्ड  पिन नंबर मागत असेल तर चुकूनही देऊ नका

 जर अशा वेबसाईट किंवा अँपवर तुम्ही फसविले गेले असाल तर त्याची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये नोंद करा व www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर पण  नोंदवा .

 केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी जे नियम व आदेश प्रसिद्ध करतील त्याचे पालन करा व गरज नसल्यास कृपया घराच्या बाहेर पडू नका. असे आवाहन सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या वतीने करण्यात आले आहे.


रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट