
मुंबईतील क्वारंटाईन सेंटर रुग्णांना जेल वाटते – किरीट सोमैया
- by Adarsh Maharashtra
- May 19, 2020
- 766 views
मुंबई : कोरोना रुग्णांना ठेवण्यासाठी तयार केलेल्या मुंबईतील बारापेक्षा अधिक क्वारंटाईन सेंटर्सना भेट दिली असता तेथे स्वच्छतागृहांची दुरावस्था, पाण्याची अपुरी सोय, निकृष्ट दर्जाच्या अन्नाचा पुरवठा होत असल्याचे आढळले. क्वारंनटाईन सेंटर ‘जेल’ वाटत असल्याची तक्रार रुग्णांनी केली, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमैया यांनी मंगळवारी दिली.
ते म्हणाले की, मुंबईतील क्वारंटाईन सेंटरची अवस्था ही तरुंगापेक्षाही वाईट असल्याचे दिसून येत आहे. शहरातील क्वारंटाईन सेंटर्सना आपण प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. याआधीही विविध क्वारंटाईन सेंटरमधली अस्वच्छता, गैरसोय या सर्व बाबी पुढे आल्या होत्या. त्या आपण संबंधितांच्या निदर्शनाला आणूनही काही सुधारणा झाली नाही. पण आता तर रुग्णांचे जेवणाचेही प्रचंड हाल होत असल्याचे दिसून येत आहे. प्रति व्यक्ती 172 रुपये महापालिका ठेकेदाराला देत असूनही अत्यंत निकृष्ट दर्जाचे अन्न कोरोना रुग्णांना मिळत असेल तर ते अत्यंत दुदैवी आहे. कोरोनावर औषध नसल्याने असे रुग्ण बरे होणे हे पूर्णपणे त्यांच्या रोग प्रतिकारक शक्तीवर अवलंबून असते. रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी रुग्णांना पोषक आहार देणे अत्यंत आवश्यक आहे. तरीही जेवणाबाबत हेळसांड केली जाते हे धोकादायक आहे.
त्यांनी सांगितले की, मुंबईत पवईत हिरानंदानी येथील एमटीएनएल ट्रेनिंग सेंटरच्या मागे असलेल्या एमएमआरडीएच्या इमारतींमध्ये क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आले आहे. 22 मजली असलेल्या या इमारतींमध्ये 1650 नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. काल या नागरिकांवर उपाशी राहण्याची वेळ आली. या सेंटरमध्ये एस वार्डमधील विक्रोळी, भांडुप, कांजूरमार्ग,
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम