
झारखंडला जाणाऱ्या मजुरांच्या एसटी बसचा यवतमाळमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू तर २२ जण जखमी
- by Adarsh Maharashtra
- May 19, 2020
- 806 views
यवतमाळ : लॉकडाऊनमुळे पोटाची खळगी भरून शकल्यानं मजुरांचं स्थलांतर सुरुच आहे. अशावेळी त्यांच्या अपघातांची मालिकाही सुरुच आहे. औरंगाबादमध्ये घडलेल्या अपघाताची घटना ताजी असतानाच, यवतमाळमध्ये मजुरांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसनं टिप्परला धडक दिल्यानं मोठा अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील ४ जणांचा मृत्यू झाला असून त्यात एसटी ड्रायव्हरचाही समावेश आहे. तर २२ जण जखमी आहेत. यवतमाळच्या आर्णी नजिकच्या कोळवन गावात हा अपघात झाला. सध्या जखमींवर आर्णीच्य गामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही बस मजुरांना घेऊन सोलापुरहून झारखंडच्या दिशेनं निघाली होती.
आर्णी तालुक्यात पहाटे साडेतीनच्या सुमारास मजुरांच्या बसला हा भीषण अपघात झाला. एसटीने मागून टिप्परला धडक दिली असल्यामुळे एसटीच्या पुढच्या भागाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तर जखमींवर आर्णी जवळच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही एसटी सोलापूर येथून मजुरांना घेऊन झारखंडच्या दिशेने जात होती पण दुर्दैवाने वाटेतच हा अपघात झाला.या अपघातातील जखमींना जवळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम