
गूढ कथा रंजक करणारी लेखणी शांत झाली, रत्नाकर मतकरींचं निधन
- by Adarsh Maharashtra
- May 18, 2020
- 826 views
मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचं रविवारी रात्री निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या निधनानं साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे. १९५५ मध्ये त्यांनी 'वेडी माणसं' या एकांकीकेपासून लेखनाचा श्रीगणेशा केला होता. त्यावेळी ते अवघे १६ वर्षांचे होते. ती एकांकीका मुंबई आकाशवाणी वरून ध्वनिक्षेपित झाली होती.
गेले काही दिवस त्यांना थोडा थकवा जाणवत होता. त्यामुळे त्यांना मुंबईतील गोदरेज रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आलं होतं. त्या ठिकाणी त्यांची करोनाची चाचणी करण्यात आली. त्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती.त्यानंतर त्यांना मुंबईतील सेव्हेन हिल्स रुग्णालयात हलवण्यात आलं. त्या ठिकाणी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
'लोककथा ७८', 'दुभंग', 'अश्वमेध', 'माझं काय चुकलं?', 'जावई माझा भला', 'चार दिवस प्रेमाचे', 'घर तिघांचं हवं', 'खोल खोल पाणी', 'इंदिरा' आणि मतकरी यांची काही अन्य नाटकं प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. तसंच 'अलबत्या गलबत्या' आणि 'निम्मा, शिम्मा राक्षस' या लहान मुलांच्या, तसंच 'आरण्यक' या नाटकांनी रंगभूमीवर आपली छाप सोडली. गूढकथा हा कथाप्रकारही त्यांनी वाचकांपर्यंत पोहोचवला. आतापर्यंत त्यांनी मोठ्यांसाठी ७० तर लहान मुलांसाठी २२ नाटकांचं लेखन केलं आहे. 'गहीरे पाणी', 'अश्वमेध', 'बेरीज वजाबाकी' या मालिका लोकांच्या अद्यापही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. त्यांच्या 'इन्वेस्टमेन्ट' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता.
विविध मान्यवर मंडळी त्यांना आदरांजली वाहत आहेत. मतकरी यांच्या जाण्याने साहित्य क्षेत्राचं खूप मोठं नुकसान झाल्याची भावना साहित्यिक बोलून दाखवत आहेत.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम