
मुंबईत आज कोरोनाबाधित ८८४ नवे रुग्ण - ४१ जणांचा मृत्यू, २३८ जण कोरोनामुक्त
- by Adarsh Maharashtra
- May 16, 2020
- 466 views
मुंबई, (प्रतिनिधी) - मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांचा वाढणारा आकडा आज पुन्हा वाढल्याने आरोय यंत्रणा पुन्हा सतर्क झाली आहे . आज मुंबईत ८८४ नवीन कोरोनाबाधित नोंदवले गेले, तर ४१ जणांचा मृत्यू झाला. यातील १४ जणांचे मृत्यू हे ७ मे ते १२ मे दरम्यान झाले होते , व त्यांचा अहवाल आज आला . तर एकाच दिवसांत २३८ रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनामुक्त होणार्यांची संख्या ४८०६ वर पोहोचली आहे.
मुंबईत गेल्या २४ तासांत विविध रुग्णालये आणि खासगी प्रयोगशाळांमध्ये केलेल्या चाचणीत ८८४ हे पॉझिटिव्ह अहवाल आल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. आज नवीन ८८४ रुग्णांची नोंद झाल्यामुळे मुंबईतील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता १८ हजार ३९६ वर पोहोचली आहे. मृत झालेल्या ४१ मृतांमध्ये २६ रुग्ण पुरुष आणि १५ रुग्ण महिला होत्या. यामधील २४ जणांना दीर्घकालीन आजार होते असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. २ रुग्णांचे वय ४० वर्षाखाली होरे , २७ रुग्णांचे वय हे ६० वर्षांपेक्षा जास्त होते. व १२ रुग्ण हे ४० ते ६० वया दरम्यान होते , आज दिवसभर ६४५ संशयित रुग्णांना रुग्णालयांमध्ये भरती करण्यात आले . त्यामुळे आता संशयित रुग्णाची संख्या १८ हजार ६७२ झाली आहे .
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम