
कर्जतमधुनही काही परप्रांतीय नागरीकांनी गाठले गाव! स्थानिकांना परप्रांतीयांचे धंद्यात घुसण्याची सुवर्ण संधी!
- by Adarsh Maharashtra
- May 14, 2020
- 446 views
कर्जत(धर्मानंद गायकवाड):- देशात कोरोना संकट आल्याने देश लाॅक डाऊन आहे. अशा परिस्थितीत सर्व उद्योग धंदे बंद असल्याचे दिसत आहे. त्यामुळे हा लाॅक डाऊन कधी उठेन आणि कधी उद्योग धंदे सुरु होतील याचा काहीच भरवसा नाही, त्यामुळे येथिल अनेक परप्रांतीय नागरीकांनी मिळेल ते वाहन पकडुन आपले गाव गाठले आहे. हे परप्रांतीय आपआपल्या गावाला गेले असल्याने आता ते पुन्हा कधी परत येतील याचा काही अंदाज नाही. त्यामुळे हे परप्रांतीय नागरीक गावाला गेल्याने आता ते कधी महाराष्ट्रात परततील याचा नेम नसल्याने परप्रांतीयांचे छोटे छोटे कमी भांडवलाचे धंद्यात स्थानिकांनी घुसण्याची सुवर्ण संधी मराठी माणसाला चालुन आली आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्यात बेरोजगारी कमी करणेसाठी मराठी मानसाने या कमी गुंतवणुक असणाऱ्या परप्रांतीयांचा धंद्यात पालेमुळे रोवावीत असे बोलले जात आहे .
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनेक धंद्यात परप्रांतीय लोकांची मक्तेदारी दिसुन येते. प्रत्येक धंद्यात “भैय्या” हा शब्द अनेकदा उच्चारला जात असतो, दुधवाला भैय्या, पाणीपुरीवाला भैय्या, पाववाला भैय्या, भेलवाला भैय्या, पीयुपीवाला भैय्या, टॅक्सीवाला भैय्या यासारखे अनेक छोटे मोठे धंदे हे परप्रांतीय नागरीक करीत आहेत. मात्र देश स्वातंत्र्य कालानंतर प्रथमच ईतकी मोठे महामारी देशात आल्याने देश हादरला आहे. अनेक परप्रांतीयांना आपले जन्मस्थान गाठले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातून बहुतांशी परप्रांतीय बाहेर पडले आहेत. तर काही पडत आहेत, त्यामुळे आता स्थानिकांनी कशाचीही तमा न बालगता लाॅक डाऊन नंतर या छोटंया छोट्या धंद्यात घुसल्याची आवश्यकता आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी बेरोजगारीही कमी होण्याच्या शक्यता वर्तविली जात आहे.
विशेष म्हणजे लाॅक डाऊनचा काल संपायची वेळ आता जसजशी जवळ येत आहे. तसतसे परप्रांतीय नागरीक मिळेल तसे आपल्या गावी पोहोचत आहेत, नेरळ कर्जत परीसरातील अनेक परप्रांतीयांचा परिसर खाली होत आसल्याचे दिसत आहेत. परीणामी भविष्यात आता परप्रांतीय लोकांचे कामे स्थानिकांनाच करावी लागणार आहेत, त्यामुळे स्थानिक मंडळी परप्रांतीयांसारखी कामे करतील की नाही? याबाबत काही बांधकाम व्यावसायीक व ठेकेदार शंका उपस्थितीत करीत आहेत. त्यामुळे लाॅक डाऊन उठल्यानंतरही काही काल राज्यातील विविध कामे ठप्पच राहण्याची शक्यता अनेकजण वर्तवित आहेत.
दरम्यान राज्यातील इतर ठिकाणासह कर्जत तालुक्यांतीलही अनेक भागांतुन परप्रांतीयांनी गाव गाठले आहे. त्यामुळे आता परप्रांतीयांचे उद्योग धंदे खाली असणार आहेत. त्यामुळे आता स्थानिक तरुणांनी परप्रांतीय लोकांसारखी मेहनत करुन छोट्या छोट्या धंद्यामधे घुसावे असा सल्ला काही व्यावसायीक देत आहेत. त्यामुळे परप्रांतीयांना महाराष्ट्र सरकार पुन्हा राज्यात येण्यास कधी परवानगी देईन की कसे, हे येणारा काळच ठरविणार असुन स्थानिकांना आता लाॅक डाऊन नंतर उदरनिर्वाह करणेची एक मोठी संधी निर्माण होणार असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम