
कोरोनाच्या काळात कामावर बोलावण्याने न्यायालयीन कर्मचारी हवालदिल
- by Adarsh Maharashtra
- May 13, 2020
- 1045 views
मुंबई :कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे शासकीय कार्यालयातील कर्मचारी वर्गात कपात करावी, असे संकेत आहे. मात्र नुकत्यात उच्च न्यायालयाच्या परिपत्रकामुळे मुंबईतील न्यायालयातील कर्मचा-यांना कामावर रुजू व्हावे लागणार असल्यामुळे त्यांच्यात भीतीचे वातावरण आहे शिवाय त्यांच्यासह कुटुंबियांमध्येही घबराट पसरली आहे.
मुंबईत असलेल्या न्यायालयांमध्ये आवश्यकतेनुसार कामकाज होण्यासाठी कर्मचारी अत्यावश्यक वेळी उपस्थित राहतात. पण आता सरसकट कर्मचा-यांना कामावर नियमितपणे उपस्थित राहण्यास सांगितल्यामुळे सर्वजण हवालदिल झाले आहेत. एवढी गरज आहे का, शिवाय खटले चालू नसतील तर अन्य काम करण्यासाठी हीच वेळ योग्य आहे का, सुरक्षिततेची जबाबदारी कोण व कशी घेणार, वाहन व्यवस्था कशी करायची,अशा अनेक समस्यांनी ते त्रस्त आहेत. शिवाय त्यांच्या कुटुंबियांमध्येही घबराट पसरली आहे. मुंबईची भौगोलिक रचना विचारात घेता या ठिकाणी कामावर येणे अत्यंत अडचणीचे आहे. शिवाय सोशल डिस्टन्टिंग पाळणेही शक्य नाही. लघुवाद सारख्या न्यायालयाच्या आवारात लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यातच काही संशयित आढळल्याने तिथे तर प्रचंड घबराट आहे. शिवाय त्यांच्या न्यायालयाचे कामकाज हे मालमत्तेशी संबंधित असल्यामुळे तितके तातडीचे नसते, अशावेळी लघुवाद न्यायालय तसेच तत्सम न्यायालयांच्या बाबतीत पुनर्विचार होऊन कोरोना संक्रमण काळ संपेपर्यंत योग्य निर्णय घेऊन कर्मचारी वर्गाला घरीच थांबवून सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम