
राज्यातील ५० टक्के कैद्यांना कारागृहातून सोडणार; महाराष्ट्र सरकारचा निर्णय
- by Adarsh Maharashtra
- May 12, 2020
- 580 views
मुंबई :करोनानं सार्वजनिक ठिकाणं, नागरी वसाहतीसह सगळीचं पाय पसरले असून तुरूंगातही शिरकाव केला आहे. काही कारागृहांमध्ये कैद्यांना करोनाची लागणं झाल्यानं राज्य सरकारची चिंता वाढली होती. त्यातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारनं राज्यातील ५० टक्के कैद्यांची कारागृहातून सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात काही कारागृहांमध्येही करोनाचा संसर्ग झाल्याचं दिसून आलं होतं. मुंबईतील ऑर्थर रोड जेल, भायखळातील महिला कारागृह, पुण्यातील येरवडा कारागृहात काही कैद्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं. त्यानंतर राज्य सरकारनं या कैद्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याचबरोबर कारागृहातील कैद्यांच्या सुरक्षेबाबत निर्णय घेतला आहे.सरकारच्या समितीनं राज्यातील ५० टक्के कैद्यांना तुरूंगातून सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 'पीटीआय' या वृत्तसंस्थेनं अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे.
राज्य सरकारनं करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच काही कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय घेतला होता. राज्यातील अनेक कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी असून, करोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे सरकारनं राज्यातील काही तुरूंगामध्ये लॉकडाउन करण्याचाही निर्णय घेतला होता. सर्वात आधी औरंगाबाद येथील हर्सूल कारागृहात लॉकडाउनची अमलबजावणी करण्यात आली. लॉकडाउनच्या काळात कारागृहांचे दरवाजे बंद ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. विशेष म्हणजे या कारागृहातील कर्मचाऱ्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था आतमध्येच निर्देश दिले आहेत.
ऑर्थर रोड जेलमधील १५८ कैदी करोनाग्रस्त
करोनाचं हॉटस्पॉट झालेल्या मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात करोनाचा अनेक कैद्यांना करोनाचा संसर्ग झाला. सुरूवातील केलेल्या चाचणीत १०३ जण करोनाग्रस्त आढळून आले होते. यात ७७ कैद्यांसह २६ पोलिसांचा समावेश होता. त्यानंतर पुन्हा ८१ कैद्यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले होतं. यामुळे एकूण करोनाबाधित कैद्यांची संख्या १५८ वर पोहोचली आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम