
चुकीची माहिती दिल्यामुळे एसटी स्थानकात गर्दी, आता अनिल परब यांना अटक होणार का ?
- by Adarsh Maharashtra
- May 12, 2020
- 880 views
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने शहरात अडकलेल्या नागरिकांना गावी जाण्यासाठी एस टी बस सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली होती. यामुळे अनेक ठिकाणी एसटी स्थानकावर गर्दी झाली होती.यावरून भाजप नेत्यांनी अनिल परब यांनी चुकीची माहिती दिली म्हणून त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी केली आहे. तर नितेश राणे यांनी अनिल परब यांना पहाटे अटक होणार का ? असा सवाल उपस्थित केला आहे.
राज्याच्या विविध शहरांत ग्रामीण भागातील भरपूर नोकरदार, विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना त्यांच्या गावाला जायचे आहे. मात्र याबाबत शासन वेळोवेळी विसंगत आदेश काढत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.त्यातून राज्यातील सर्व एसटी स्थानकांवर त्यातून गर्दी झाली. परब हे बेजबाबदारपणे वागल्याने हजारो नागरिकांचे हाल झाले. सोशल डिस्टन्सिंग पाळले न गेल्याने कोरोना संसर्गाचा मोठा धोका निर्माण झाला. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करून त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी भाजपचे सरचिटणीस अतुल भातखळकर यांनी केली.
चुकीची माहिती दिली आणि वांद्रेला गर्दी झाली म्हणून राहुल कुलकर्णीला महाराष्ट्र सरकारने अटक केली. आज चुकीची माहिती दिली म्हणून एसटी डेपोच्या बाहेर गर्दी झाली.मग ही माहिती देणारे मंत्री अनिल परब ना उद्या पहाटे अटक होणार का, असा सवाल भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विचारला आहे.
राज्यात तूर्तास आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक सुरू नाही. सर्व जिल्हाधिकारी आणि पोलिस यंत्रणेसोबत चर्चा करून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.मुंबईतील लोक कोरोना घेऊन येतील, अशी भीती राज्यातील विविध गावांच्या गावकऱ्यांमध्ये पसरली आहे. या भीतीतूनच मुंबईतून अन्य जिल्ह्यांमध्ये माणसे पाठवू नका आणि कोरोना पसरवून नका, अशा तक्रारी आमच्याकडे आल्या. त्यामुळे आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीवर नियोजन करून याबाबत आम्ही निर्णय घेऊ, असे आश्वासन परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम