शिस्त बिघडवणे म्हणजे संकट वाढविणे-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई:राज्यातील अनेक भागात शिस्त बिघडलेली दिसते. शिस्त बिघडवणे म्हणजे संकट वाढविणे आहे. लॉकडाऊन गतीरोधक आहे. मात्र, कोरोनाची चेन तोडण्यात अद्याप यश आलेले नाही. आता ही चेन तोडायची आहे. कोरोनाचा विषाणूचा प्रसार कायमचा संपवायचा आहे. त्यासाठी लॉकडाऊन कठोरपणे पाळा. लॉकडाऊन वाढविण्यात आपल्याला आनंद नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी आज, शुक्रवारी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला.

मुंबईत लष्कराला पाचारण करणार अशी अफवा उठली आहे. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबईत लष्कराला पाचारण करणार नाही, असे स्पष्ट केले. आरोग्य यंत्रणा, सफाई कामगार, पोलिस तणावाखाली काम करत आहेत. त्यासाठी अधिकचं मनुष्यबळ लागलं तर केंद्र सरकारकडे तशी मागणी करु. राज्यातील पोलिसांना थकवा घालवण्यासाठी विश्रांतीची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे. माहिती सेवा ग्रूप पेठवडगांवची पोस्ट,केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाबरोबर जगा असे म्हटले होते. या वक्तव्याचा मुख्यमंत्र्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. कोरोनाबरोबर जगा, हे चालणार नाही, असे सांगत त्यांनी केंद्र सरकारला टोला लगावला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाचे १८ हजार पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर सव्वा तीन हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोविड पॉझिटिव्ह मातांच्या पोटी कोविड निगेटिव्ह बाळं जन्माला आली आहेत. ती सुखरुप आहेत. हा निसर्गाचा चमत्कार म्हणावा लागेल, असेही त्यांनी सांगितले. 

हॉस्पिटलमध्ये गलथानपणा नको, कारवाई करायची वेळ आणू नका, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

 औरंगाबादजवळ रेल्वे रुळावर झोपलेल्या १६ मजूरांचा चिरडून मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. या घटनेने मनातून दु:खी झालो. त्यामुळे जेथे आहात तेथेच थांबा, सरकार तुम्हाला तुमच्या घरी पोहोचवेल, तुम्ही बैचेन होऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कामगारांना केले आहे.

काल सर्वपक्षीय नेत्यांसोबत झालेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, राजकारण बाजूला ठेवून सर्व पक्ष प्रमुख एकत्र आले. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे. काल सर्व पक्षांच्या नेत्यांची एकजूट दिसली.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट