
भांडुपच्या "एस" विभागात कोरोनाचे 24 तासात 32 पॉझिटिव्ह नवीन रुग्ण आढळले.
गुरुवारी एकाच दिवशी नव्या रूग्णांची विक्रमी वाढ !
- by Adarsh Maharashtra
- May 08, 2020
- 947 views
पोलीस प्रशासन, मनपा प्रशासन, आरोग्य विभाग, व लोक प्रतिनिधींनी जर ठरवले तर कोरोनाची साखळी तुटेल.!
मुंबई: कोरोना रुग्णांची संख्या मनपा "एस "विभाग प्रभाग क्षेत्रात गेल्या 24 तासात तब्बल 32 ने वाढ झाल्याने, कोरोना पॉझिटिव्ह बाधित रुग्णांची संख्या 306 वर पोचली असल्याची माहिती समोर आली आहे.
भांडुप विधानसभा क्षेत्रात सर्व पक्षांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करूनही कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्व लोक प्रतिनिधींनाच धक्का बसलाय. मात्र, मनपा प्रशासनाच्या आरोग्य विभागाची यंत्रणा पूर्णता: कुचकामी ठरल्याने बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सगळेच हतबल झाले आहेत.
"एस "विभाग क्षेत्रात कोरोणा पॉझिटिव रुग्ण आढळल्याने संबंधित परिसर सील केले गेले यामुळे आता लाॅकडाऊनचे गांभीर्याने पालन करा .असा सावधगिरीचा इशारा देण्याची वेळ आली आहे. बुधवारी रात्री व गुरुवारी सायंकाळपर्यंत 32 नवीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.रुग्णांची संख्या आता 306 पर्यंत पोचली गेल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजते. सावधगिरीचा इशारा म्हणून सर्व नगरसेवक आपापल्या विभागात दक्ष झालेले दिसत होते.
काही प्रभागात समूह संसर्गाच्या भीतीने परिसर सील करण्यात आल्याने सकाळपासून विभागातील रस्ते निर्मनुष्य झाल्याचे चित्र पहायला मिळाले.कोरोना रुग्णांपैकी बहुतांशी रुग्णांचे पॉझिटिव्ह अहवाल हे पवई, विक्रोळी,भांडुप सोनापूर, विभागातील लोकांचे आहेत.विशेष म्हणजे ,कोणत्याही प्रवाशांची पार्श्वभूमी नसलेले किंवा कुठल्याही पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात नसलेले लोक सध्या पॉझिटीव्ह येत असल्याने जनमाणसात कोरोणाची भीती वाढली आहे.
"एस" विभागाच्या कक्षेत येणाऱ्या रुग्णालयांचा आढावा घेतला असता, या संसर्ग साखळीत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काल व आज बाधीत आढळून आलेले बहुतांश रुग्ण हे सर्व सील करण्यात आलेल्या कंटेनमेंट झोन मधीलच असून कोरोना रुग्णांचे नातेवाईक असल्याचे सांगण्यात येते.
नव्या रुग्णांमध्ये कोरोणाचा "हॉटस्पॉट" असलेल्या विक्रोळी, सोनापूर , पवई, येथील रुग्णांची संख्या अधिकच आहे. अर्थातच, आता हे रुग्ण कुणाकुणाच्या थेट संपर्कात आले ,या विषयाचा शोध मनपा प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम