कर्जत तालुक्यांतील खांडस गावातील ईसमाची हत्या!

नेरळ पोलिसात ११ जणांवर गुन्हा नोंद; आरोपी अटक!

कर्जत(धर्मानंद गायकवाड):- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यांतील खांडस गावात काल रात्री हाहाःकार उडाला, येथिल एका समुहाने एकत्रित येवुन याच गावातील ४९ वर्षीय ईसमाची तीक्ष्ण हत्याराने हत्या केल्याने संपुर्ण तालुका हादरून गेला आहे. या प्रकरणी नेरळ पोलिसात खुनाचा गुन्हा नोंद झाला असुन पोलिसांनी काही आरोपींना शिताफिने अटक केली आहे. 

याबाबत नेरळ पोलिस सुत्राकडुन मिळालेल्या माहीतीनुसार सध्या कोरोना संकटाने देश लाॅक डाऊन आहे. त्यामुळे या कोरोनाचा भितीने कोणीच घराबाहेर पडत नसतानाच कर्जत तालुक्यांतील खांडस गावात नळाची पाईपलाईन टाळण्याचे काम आरोपींनी सुरु केले होते. त्यासाठी चर खोदण्याचे काम करीत असतानाच याच गावातील शिवाजी गोविंद पाटील (वय४९) यांच्या खाजगी जागेतून हे चर खोदले जात असतानाच यास पाटील यांनी त्यांना विरोध केला. याचा राग आल्याने या प्रकरणातील आरोपी आणि शिवाजी पाटील यांच्यात शिवीगाळ व बाचाबाची झाली होती. या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारी मध्ये होवुन या घटनेतील आरोपींनी तीक्ष्ण हत्याराचा वापर करीत शिवाजी गोविंद पाटील यांच्यावर वार केले. यामधे शिवाजी गोविंद पाटील हे या हाणामारीत ठार झाले आहेत. याबाबतची खबर नेरळ पोलिसांना मिळताच नेरळ पोलिस ठाणेचे अधिकाऱ्यांनी, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

या प्रकरणाची फिर्याद मयताचे नातेवाईकांनी नेरळ पोलिस ठाण्यात नोंदविलेली असुन नेरळ पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ६२/२०२० अन्वये भादवि कलम ३०२ नुसार आरोपी मच्छींद्र जनार्दन ऐनकर यांच्यासह ११ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कर्जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळचे पोलिस अधिकारी अविनाश पाटील व त्यांचे पोलिस कर्मचारी करीत आहेत. यावेळी या घटनेतील ११ आरोपी पैकी ९ आरोपींना पोलिसांनी अटक केली असुन २ जण फरार झाले आहेत. फरार आरोपींचा नेरळ पोलिस कसुन शोध घेत आहेत. या घटनेने संपुर्ण कर्जत शहर हादरले आहे. लाॅकडाऊनचा काल असताना खांडस गावातील शिवाजी पाटील यांची झालेल्या हत्येमुळे एकच खळबळ माजली आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट