रेंटोकील पी,सी.आय कंपणीतर्फे अनेक पोलीस स्टेशनवर मोफत निर्जंतुकीकरण

मुंबई(शांताराम गुडेकर )भारत आज कोरोनाव्हायरस ने थैमान घातले आहे. या कोरोनाव्हायरस च्या अभूतपूर्व संकटाचा सामना सगळं जग करत आहे, आणि याचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने जे जे शक्य होईल ते ते करत आहे.कोरोनाव्हायरस चा प्रसार रोखण्यासाठी त्याच्या लक्षणांचा अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट सगळ्यांना जाणवली आहे की या संकटावर मात करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि आपल्या राहत्या जागेचे, काम करण्याच्या आणि आजुबाजुच्या  सर्व परिसराचे निर्जंतुकीकरण करणे हे दोन प्रमुख उपाय आहेत.

आज केंद्रातील सरकार पंतप्रधान  नरेंद्र मोदींच्या अधिपत्याखाली तर महाराष्ट्रातील सरकार मुख्यमंत्री उध्दवजी  ठाकरे यांच्या अधिपत्याखाली कोरोना व्हायरसशी दोन हात करते आहे. अनेक नगरसेवक जनतेच्या मदतीला धावून आले आहेत आणि प्रत्येक भागात त्यांच्या मार्फत मोफत निर्जंतुकीकरण करून देत आहेत. अशा या अत्यंत आणीबाणीच्या लढाईमध्ये पीसीआय पेस्ट कंट्रोल आणि हायजीन कंपनी म्हणजेच' रेंटोकील पी. सी. आय ' ही कंपनी जरा सुद्धा मागे राहिलेली नाही. रेंटोकील पी. सी .आय ने सामाजिक बांधिलकी आणि  जबाबदारीची जाणीव ठेऊन या कोरोना लढाईमध्ये सोशल डिस्टनसिंग साठी सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे आपले पोलिस कर्मचारी यांचे पोलीस स्टेशन आणि पोलिसांची वाहने यांच्या निर्जंतुकीकरणाचे काम मोफत करत आहे.रेंटोकील पी.सी. आय, आज संपूर्ण भारतातील अनेक पोलिस स्टेशन वर विनामूल्य फवारणीचे काम करत आहे.या  रेंटोकील पी. सी. आय् कंपनीचे कर्मचारी आणि अगदी व्यवस्थापक पदावरील कर्मचारीसुद्धा या लढाईसाठी मैदानात उतरले आहेत आणि आपल्या पोलिसबांधवांना  या निर्जंतुकीकरण प्रक्रियेतून जास्तीत जास्त संरक्षण कसे मिळेल याच्यासाठी आज पूर्ण प्रयत्न करत आहे. आतापर्यंत या कंपनी ने विरार, अंधेरी, पवई,ओशिवरा,जुहू, सांताक्रूझ, मालाड, वनराई (गोरेगाव ), अंधेरी एम आय डी सी ,कळवा,ठाणे, दहिसर, पाय धुनी भागातील पोलिस स्टेशन येथे निर्जंतुकी करण करून दिले आहे तर येत्या आठवड्यात नालासोपारा,वसई,बोईसर,पालघर,डहाणू,काशिमीरा, कांदिवली, जुहू, खेरवाडी पासून दक्षिण मुंबईतील प्रभादेवी, लोअर परेल, काळबादेवी पर्यंत सर्व पोलिस स्टेशन तसेच मध्य रेल्वे  मार्गावरील आणि नवी मुंबईतील पोलिस स्टेशनवर पण फवारणी करून देणार आहे.अधिक माहितीसाठी कंपनीच्या १८०० २१२ २१२५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट