सुनिल तात्यासाहेब पोळ यांनी केले १०० वेळा रक्तदान

मुंबई ,(शांताराम गुडेकर)  सुनिल तात्यासाहेब पोळ यांनी त्यांच्या वयाच्या १९ व्या वर्षापासुन रक्तदान केले आहे. सुनिल हे कुर्ला नागरिक सहकारी बँक भांडुप पश्चिम येथे शाखाधिकारी असून गेल्या २१ वर्षापासून ग्राहक सेवेत आहेत. १९९२ - ९३ साली झालेली दंगल व १२ मार्च मुंबई बॉम्ब स्फोटात झालेले निष्पाप बळीचा रक्तपाट पाहून आपल्या सर्वांचे मन हेलावून गेले होते. तेव्हाच पोळ यांच्या मनात कुठे तरी भावना निर्माण झाली होती कि, जर रक्तदान करून आपण लोकांना जीवदान देऊ शकलो तर सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी नक्की कार्य ही करू शकतो असे मनाशी ठरवून त्यांनी रक्तदानाला सुरवात केली. १९९४ मध्ये पोळ यांचे जवळचे नातेवाईक टाटा हॉस्पिटला कॅन्सरसाठी उपचार घेत होते. तेव्हासुद्धा त्यांनी रक्तदान केले होते. पण, तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांना रक्तदान केल्यावर रक्ताचे महत्व काय? हे टाटा हॉस्पिटलमधील रक्तपेढी येथील कार्यरत असणारे वरिष्ठ टेक्निशीयाना रविंद्र केंजळे संचालक ज्ञानदीप सहकारी पतपेढी यांनी पटवून दिले. असे सुनिल यांनी स्पष्ट केले. 


  त्यांच्या आई - वडीलांच्या व मुलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तर कधी मित्रमंडळी, नातेवाईक यांच्यासाठी वेळोवेळी ते सायन केईम (KEM), टाटा, बांद्राच्या भाभा, पुजा समर्पण पल्लवी इतर अनेक ब्लड बँक याठिकाणीे पोळ हे रक्तदान करतात. माझ्या मित्र परिवार, या सर्वांचे आशीर्वाद, शुभेच्छा सदैव माझ्या पाठीशी होत्या. त्यामुळे मला हे रक्तदानासारखे अनमोल कार्य करण्याचे बळ मिळाले आहे. म्हणून मी या सर्वांचे शतशः आभारी आहे. असे आपले मत सुनिल यांनी यावेळी व्यक्त केले. सुनिल पोळ यांनी १०० वेळा रक्तदान केल्याबद्दल पल्लवी रक्तपेढीच्या संस्थापक भाऊ कोरगावकर, संचालक जयसिंग विश्वकर्मा आणि जनसंपर्क अधिकारी भीमराव  काळेबाग या सर्व मंडळीनी त्यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा सक्तार व कौतुक ही केले. रक्तदान हे जिवनदान, श्रेष्ठ दान आहे. आपण केलेल्या एका रक्तदानाने तीन रुग्णांचे प्राण वाचवले जातात. जसं  कि त्या रक्ताचे विघटन करून रुग्णाच्या गरजेनुसार  पॅकसेल, प्लेटलेट्स व प्लाझमा असे तीन प्रॉडक्ट बनविले  जातात. जे विविध गंभीर आजारावर उपचार करण्यासाठी वापरतात. *उदा.- मलेरिया, डेंग्यू, कॅन्सर व ऍनिमियाव बायपास सर्जरी आणि अन्य सर्जरीवर*, तरी आपण तीन  महिण्यातून एकदा व वर्षात ४ वेळा रक्तदान करू शकतो. प्रत्येक मानवाच्या शरीरात ५ ते ६ लिटर रक्त असते व  त्यामधून ३५० मिली किंवा ४५० मिली रक्त वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्याने घेतले जाते व पुढच्या २४ तासात आपल्या शरीरात पुन्हा नव्याने रक्ताची निर्मिती  होते. तरी असे हे अनमोल रक्तदान करण्यासाठी सर्वांनी  न घाबरता एक सामाजिक बांधिलकीचा वारसा जपण्यासाठी स्वतः हुन पुढे येऊन या महान कार्यात  सहभागी व्हावे. असा संदेश पोळ यांनी देऊन जनतेला आव्हान ही केले.  तसेच आजचे हे त्यांचे १०० वे रक्तदान त्यांनी त्यांच्या आई - वडिलांच्या पवित्र स्मृतीस व कॉविड - १९ च्या योद्धाना समर्पित केले आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट