
राज्यातील तळीरामांचे घसे 'ओले' होणार;सुरु होऊ शकतात ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील दारुची दुकाने
- by Adarsh Maharashtra
- May 02, 2020
- 700 views
मुंबई :- देशातील सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये काल 17 मे पर्यंत वाढ करत असतानाच दारुची दुकाने आणि पानाची दुकाने सुरु करण्याची केंद्र सरकारने सशर्त संमती दिली आहे. पण, ही परवानगी ग्रीन झोन आणि ऑरेंज झोन असणाऱ्या ठिकाणीच देण्यात आली आहे. याबाबत अद्याप राज्याकडून निर्यण घेण्यात आला नसल्यामुळे आणखी काही काळ तळीरामांना वाट पहावी लागणार आहे. दारूची दुकाने लॉकडाऊनमध्ये सुद्धा बंद करण्यात आली होती. यामुळे मोठ्या प्रमाणात महसूल येणे बंद झाले. परिणामी दारुच्या दुकाने सुरू करण्याची मागणी अनेकांनी केली होती. त्यानुसार केंद्राने परवानगी दिली आहे.
राज्य सरकारने या लॉकडाऊन काळात काही गोष्टींमध्ये सुट दिली आहे.याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने पत्रक काढून यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार, राज्यात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन संदर्भात वेगवेगळे नियम करण्यात आले आहेत. यात रेड झोनसाठी अतिशय कमी तर ग्रीन झोनसाठी सर्वाधिक सुट देण्यात आली आहे.
नव्या नियमावलीनुसार ग्रीन झोन जिल्ह्यामध्ये 50 टक्के क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू राहणार आहे. तसेच ग्रीन झोनमधील दारूची दुकाने आणि पान शॉप्स सुरू ठेवण्याचा विचारही सरकार करत आहे. परंतु, दुकानदाराने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे. 17 मे पर्यंतच्या लॉकडाऊन काळात बस डेपोमध्ये 50 टक्केच कर्मचारी काम करणार आहेत.दारू, पान गुटखा व तंबाखू विकणाऱ्या दुकानांनी केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या निर्देशांप्रमाणे प्रमाणे ग्राहकांमध्ये किमान सहा फूट अंतर ठेवायचे आहे. तसेच एकावेळी पाच पेक्षा जास्त लोक दुकानात नसतील याचीहीही खबरदारी घ्यायची आहे. पण, राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की विभागाकडून याबाबत कुठल्याही सूचना देण्याऐवजी, दारूची दुकाने सुरू करायची का नाहीत हा निर्णय संबंधित जिल्हाधिकाऱ्यांवर सोडण्यात येईल. कारण या अधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवरच्या नेमक्या परिस्थितीचे अधिक चांगले आकलन आहे. राज्य शासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर काही बिअर व दारू बनवणाऱ्या उद्योगांनी उत्पादन सुरू केले आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम