
कोट्यवधींचा महसूल पाण्यात!मुंबईत एप्रिलमध्ये फक्त 27 कागदपत्रांची नोंदणी
- by Adarsh Maharashtra
- May 02, 2020
- 388 views
मुंबई :- कोरोना संकटामुळे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन कागदपत्रांच्या नोंदणीतून मुंबईतून अवघ्या 27 कागदपत्रांची नोंदणी एप्रिलमध्ये झाली आहे. ही नोंदणी सरासरीच्या तुलनेत 0.001 टक्के इतकीच आहे. कोट्यावधी रूपयांचे महसूली उत्पन्न मिळणाऱ्या स्टॅम्प ऍण्ड रजिस्ट्रेशन विभागातून अवघा 43 हजार रूपयांचा महसूल जमा झाला आहे.
मार्चमध्ये स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनच्या कार्यालयात 25 हजार 170 कागदपत्रांची नोंदणी करण्यात आली.त्यामधून सरकारला 377 कोटी 13 लाख रूपयांचा महसूल मिळाला होता. पण एप्रिलमध्ये फक्त 27 कागदपत्रांची नोंदणी झाली. या नोंदणीतून 43 हजार रूपयांची रक्कम सरकारच्या तिजोरीत जमा झाली आहे.
मार्चमध्ये 12 हजार 907 कागदपत्रे ई रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून लिव्ह ऍण्ड लायसन्ससाठी नोंदणी करण्यात आली. तर नोंदणी केलेल्या कागदपत्रातून 1.91 कोटी रूपयांचा महसूल सरकारला मिळाला. रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये लिव्ह ऍण्ड लायसन्स, ई रजिस्ट्रेशन, फिजिकल, कन्वेयन्स डिड, सेल एग्रीमेंट, मोर्जाज डीड, गिफ्ट डीड यासारख्या अनेक कागदपत्रांची नोंदणी या कार्यालयातून होते. पण मार्चपासून सुरू झालेल्या कोरोनाच्या संकटामुळे नोंदणी प्रक्रियेत विघ्न निर्माण झाले आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम