महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा 597 ने वाढला असून एकूण रुग्णसंख्या 9915 आहे.

दिवसभरात 32 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यातील 26 मृत्यू मुंबईत झाले आहे.

मुंबई :  महाराष्ट्रात  आज कोरोनाच्या 597 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 9915 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 32 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 26 जण मुंबईचे तर पुण्यातील 3 आणि सोलापूर, औरंगाबाद, पनवेल येथील प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 432जणांचा मृत्यू झाला आहे. आज 205 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 1 लाख 37 हजार 159 नमुन्यांपैकी 1 लाख 26 हजार 376 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 9915 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 62 हजार 860 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 10 हजार 813 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 1593 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी 25 पुरूष तर 7 महिला आहेत. त्यातील 17 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 15 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर एक रुग्ण 40 वर्षांखालील आहे. 31 रुग्णांपैकी 18 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत.

महाराष्ट्र एकूण रूग्ण – 9915

मृत्यू - 432

मुंबई महानगरपालिका- 6644 मृत्यू 277

ठाणे- 46  मृत्यू 2 

ठाणे महानगरपालिका- 373 मृत्यू 4

नवी मुंबई मनपा- 162 मृत्यू 3

कल्याण डोंबिवली- 158 मृत्यू 3

उल्हासनगर मनपा - 3

भिवंडी, निजामपूर - 15

मिरा-भाईंदर- 125  मृत्यू 2

पालघर- 41 मृत्यू 1 

वसई- विरार- 128  मृत्यू 3

रायगड- 23

पनवेल- 46 मृत्यू 2

नाशिक - 5

नाशिक मनपा- 19

मालेगाव मनपा - 171 मृत्यू 12

अहमदनगर- 26 मृत्यू 2

अहमदनगर मनपा - 16

धुळे - 8 मृत्यू  2

धुळे मनपा - 17 मृत्यू 1

जळगाव- 30  मृत्यू 8

जळगाव मनपा- 10  मृत्यू 1

नंदुरबार - 11  मृत्यू 1

पुणे- 58  मृत्यू 3

पुणे मनपा- 1062 मृत्यू 79

पिंपरी-चिंचवड - 72  मृत्यू 3

सातारा- 32  मृत्यू 2

सोलापूर- 7

सोलापूर मनपा- 78  मृत्यू 6

कोल्हापूर- 7

कोल्हापूर मनपा- 5

सांगली- 28

सांगली, मिरज, कुपवाड मनपा- 1  मृत्यू 1

सिंधुदुर्ग- 2

रत्नागिरी- 8  मृत्यू 1

औरंगाबाद -2

औरंगाबाद मनपा- 103 मृत्यू 7

जालना- 2

हिंगोली- 15

परभणी मनपा- 1

लातूर -12 मृत्यू 1

उस्मानाबाद-3

बीड - 1

नांदेड मनपा - 3

अकोला - 12  मृत्यू 1

अकोला मनपा- 27

अमरावती- 2

अमरावती मनपा- 26  मृत्यू 7

यवतमाळ- 79

बुलढाणा - 21  मृत्यू 1

वाशिम - 2

नागपूर- 6

नागपूर मनपा - 132  मृत्यू 1

भंडारा - 1

चंद्रपूर मनपा - 2

गोंदिया - 1

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 703 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून एकूण 9811 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 40.43 लाख लोकांचे सर्वेक्षण केले आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट