रेशन दुकानदाराला पाठीशी घालणारा अधिकारी बोरोडे वर निलंबनाची तात्काळ कारवाई करा अन्यथा अन्न त्याग आंदोलन करणार ;सुरेश वाघमारेंचा निर्वाणीचा इशारा

मुंबई :प्रतिनिधी; कोरोनाच्या आणीबाणीत सरकारने सर्वांना अन्न धान्य मिळावे म्हणून  रेशन दुकानदारांना सक्त निर्देश दिले असताना तरी सुद्धा दुकानदार नियमाचे पालन करत नसल्याच्या घटना घडत  आहेत  असाच गंभीर प्रकार मालाड पश्चिम येथील रातोडीगाव दुकान क्रमांक ४२ग/१९४ या  दुकानातील काळाबाजार उघड  करूनही अदयाप काहीही कारवाई  सदर दुकानदारावर  झालेली  नसून याउलट निरीक्षक अभिजित बोरोडेनी  सुरेश वाघमारे यांना फ़ोन वरून  रेशन बद्दल केलेल बेजबाबदार वक्तव्य " तुम्ही तुमच  बघा  लोकांचं सोडा हो आणि केलीली तक्रार माघे घ्या अशी दरडावत केलेली भाषा एका जबाबदार  अधिकाऱ्याला अशोभनीय असून  याबाबत तक्रारदार  सुरेश वाघमारे  यांनी या  उर्मट अधिकारी  व काळाबाजार करणाऱ्या  हक्काचं रेशन  नाकारणाऱ्या पावती  न देणं  दुकान  सतत बंद  ठेवीत  शिधाधारकांना वेठीस धरणे या सारख्या गंभीर घटनेबाबत सोशल मीडिया व वतर्मानपत्राद्वारे   पोलखोल करून आज ८ दिवस पूर्ण  होऊन  गेले  तरी  अद्याप कुठली  कारवाई  झालेली  नाही  खातेनिहाय चौकशी होत असल्याने वरिष्ठ  अधिकारी आपल्या  अधिकारी  अभिजत बोरोडेना व भ्रष्ट दुकानदाराला वाचविण्याचे आटोकाट प्रयत्न करीत  असल्याचे दिसून  येत आहे जर  या  अधिकाऱ्यांना  वेळीच जरब नाही  मिळाली  तर  हा  रेशनमधला भ्रष्टाचारी अधिकारी राजरोसपणे काळाबाजारी वाढतं जाईल या सर्व घटनेचा तपास रेशन खातेनिहाय होतं असलेली  चौकशी संशयास्पद दिसत असून     या घटनेला पायबंद घालण्यासाठी तक्रादार सुरेश वाघमारे यांनी कुठलीच कारवाई होत  नसल्यामुळे अखेर मालाड रेशनच्या काळाबाजारी विरुद्ध आंदोलनाचे बंड  पुकारले असून निरीक्षक अभिजित बोरोडे ला  तात्काळ निलंबीत करा व मालाड पश्चिम रातोडीगाव येथील नीलिमा को ऑप सोसायटी मधील  दुकान क्रमांक ४२  ग/ १९४ याचा  परवाना रद्द करावा अन्यथा  लॉकडाऊनच्या  पार्श्वभूमी मुळे रस्त्याची लढाई  धरणे आंदोलन  करता  येत नसल्यामुळे  आपल्या न्याय हक्कासाठी लोकशाही मार्गाने वाघमारे हे  आपल्या  घरातच दिनांक १ मे ला महाराष्ट्र दिनी   एक दिवशीय अन्न त्याग आंदोलन करणार असून  जर  हे  करूनही कारवाई न झाल्यास घरातच बेमुदत अन्न त्याग आंदोलन करणार असून  जर  माझ्या जीवाचं बर वाईट  झाल्यास  उदभणाऱ्या परिस्थितीस मुख्यमंत्री जबाबदार असतील  असा निर्वाणीचा इशारा सुरेश वाघमारे यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे दिला आहे

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट