
समाजकंटकांनी केली पोलिस केंद्रावर तोडफोड, स्थिती नियंत्रणात
- by Adarsh Maharashtra
- Apr 23, 2020
- 1411 views
नाशिक/ मालेगाव ( चंद्रशेखर गोसावी) : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे संचारबंदी दरम्यान पोलिसांनी एका युवकाला हटकले. त्याला काठी मारून परत पाठवल्याने संतप्त झालेल्या जमावाकडून शहरातील अय्युबी चौकात पोलिस केंद्रावर तोडफोड करण्यात आली. यावेळी अतिशय जलदगतीने तेथे राज्य राखीव दलाचे वाहन दाखळ झाल्याने जमाव पांगण्यास व स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस यशस्वी झाले.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव हे एक राज्यासाठी मोठी डोकेदुखी होऊ लागली आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर मालेगाव तालुक्यामध्ये होत असून सातत्याने आत्तापर्यंत राज्यामध्ये मालेगाव हा एकमेव तालुका शंभरच्यावर रुग्ण होण्यात झाला आहे. पहिल्यापासूनच कोरोना विषाणूच्या पाश्र्वभूमीवर लगबग सुरू असताना मालेगाव चे आमदार मुक्ती मोहम्मद यांनी त्यांचे त्यांचे प्रतिस्पर्धी माजी आमदार व त्यांच्या सहकाऱ्यांवर मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार का केले जातात यावरून डॉक्टरला मारहाण केली होती तर ही घटना ताजी असतानाच आठ दिवसांच्या अंतराने एका संसर्ग झालेल्या रुग्णाला वाडिया रुग्णालयात दाखल न करता मनपाच्या दुसऱ्या रुग्णालयात नेल्याने रुग्णवाहिकेच्या चालकावर रुग्णालयात होण्याचा प्रकार झाला होता तर रुग्ण दगावला नंतर रुग्णालयात मोठा गोंधळ घातल्याचे प्रकरण या पंधरा दिवसांमध्ये झाले हे कमी आहे की काय म्हणून आज गुरुवारी सकाळी येथील काही समाजकंटकांनी नको ते कारण तू परत थेट पोलिसांवर ती हल्ला चढवून मालेगाव शहरातील वातावरण गढूळ करण्याचे कार्य सुरू केल्याचा प्रकारही समोर आला आहे.
आज गुरुवार सकाळी साडे आठला एक युवक दूध घेण्यासाठी गेला होता. यावेळी संचारबंदी व सोशल डिस्टन्सचे उल्लंघन होत झाल्याने पोलिसांनी त्यांना समज दिली. यावेळी शाब्दिक वाद झाल्याने पोलिसांनी या युवकाला काठीने फटका मारला. हा युवक परतताना तो जखमी झाल्याची चर्चा सुरु झाली. ती अफवा परिसरात पसरल्याने संतप्त जमावाने एकत्र येऊन सुमारे १५०-२०० जणांन चा जमाव अल्लामा एकबाल पुलाजवळ असलेल्या पोलिस केंद्राकडे गेला. जमाव मोठा असल्याने तेथील बंदोबस्तावर असलेले पोलिसांनी नियंत्रणात आणण्यासाठी इशारा देत होते. जमाव मोठ्या प्रमाणात आरडा ओरडा करीत पुढे सरकत होता.आणि या ठिकाणी कमी पोलीस ठाण्यात असल्याचा फायदा घेऊन पोलिसांनी केंद्राबाहेर टाकलेल्या खुर्च्या रस्त्यावर फेकण्याचे काम सुरू केले आजूबाजूला काही लोक आरडाओरड करत होते तर काहीजण पुढच्या तयार होते मात्र त्याच वेळी जमावाची मानसिकता लक्षात घेऊन पोलिस तेथून मागे सरकत होते. याचवेळी मालेगाव येथील पोलीस नियंत्रण कक्षाने घटनास्थळावरून दिलेल्या पोलिसांनी माहितीनुसार तातडीने राज्य राखीव दलाचे वाहन जवानांसह तेथे दाखल झाले. त्यानंतर हा जमाव मागे सरत निघून गेला व स्थिती नियंत्रणात आली. मात्र या घटनेने शहरात एकच गोंधळ उडाला.दरम्यान या घटनेनंतर तातडीने वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थितीचा आढावा घेतला. अय्युबी पुलावर जादा कुमक तैनात करण्यात आली. पोलिस उपअधिक्षक रत्नाकर नवले, वरिष्ठ निरीक्षक मंगेश चव्हाण आदींनी स्थितीचा आढावा घेतला.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम