
मा. शिवसेना नगरसेवक वसंत गौतम भगत यांचे म्हात्रेनगर विभागात जातीने लक्ष
- by Adarsh Maharashtra
- Apr 21, 2020
- 1215 views
डोंबिवली :(प्रदिप मस्तकार) म्हात्रे नगर विभागातील शिवसेनेचे माजी नगरसेवक वसंत गौतम भगत हे म्हात्रे नगर विभागावर बारीक लक्ष ठेवून आहेत.विभागात ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना भरपुर वस्तूंची मदत करतातच त्याशिवाय विभागातील सर्व इमारतीमधील नागरिकांना यथाशक्ती तांदूळ वाटप करत आहेत.शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत अहोरात्र झटत आहेत.विभागातील वृद्ध नागरिकांना ते योग्य मार्गदर्शन करत आहेत. विभागातील सर्व नागरिकांनी विशेष करून महिला वर्गाने त्यांचे या कार्याबद्दल खूप अभिनंदन केले. वसंत भगत यांचा कामाचा उरक का वाखाणण्याजोगा आहे गेली अनेक वर्षाचे विभागात धडाडीने काम करत आहेत. विभागातील रेशन दुकानात मिळणाऱ्या वस्तू सर्व नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत की नाही यावर इथे ते लक्ष ठेवून आहेत. रेशन दुकानदार काळाबाजार तर करत नाही ना त्यांच्याकडे ते बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. सध्याचा लॉक-डाऊन परिस्थितीत विभागातील नागरिकांना काही त्रास तर होत नाही ना याकडे लक्ष घालत आहेत.अडीअडचणीच्या काळात नागरिकांना कुठल्याही प्रकारची मदत मिळवून देण्यात शिवसेना कधीही अग्रेसर असते हे या घटनेवरून दिसून येते. केवळ संकटकाळीच नव्हे तर इतरही कधी जर त्यांच्याकडे विभागातील नागरिक गेला तर रिक्त हस्ताने तो परत येत नाही त्याचे काम करूनच त्याला परत पाठवले जाते असा त्यांचा खाक्या समजला जातो. या विभागातील नागरिकांनी दिलेल्या त्यांच्याबद्दलच्या चांगल्या प्रतिक्रिया ही त्यांनी केलेल्या गेल्या अनेक वर्षांतील कामाची पोचपावती समजावी लागेल. पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत सतत आपल्याला कामात झोकून देणारे हे वसंत भगत एक अवलिया व्यक्तिमत्व समजले जाते. कुठलाही भेदभाव न करता सर्वच सर्वच नागरिकांना मदत करणे हे त्यांचे आद्य कर्तव्य आहे असे ते मानतात.अशा या हाडाच्या कार्यकर्त्याला दैनिक आदर्श महाराष्ट्रातर्फे मानाचा मुजरा. ईश्वर त्यांना अशाच लोकोपयोगी कामासाठी सतत झटायची प्रेरणा व शक्ती देवो.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम