मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत सलग तिसऱ्यांदा घट

मुंबई, दि. १८ (प्रतिनिधी) : मुंबईत काही भाग कोरोनाग्रस्तांचे हॉटस्पॉट ठरत असले तरी एकूण रुग्णांची संख्या मात्र घटत आहे.  मुंबईकरांच्या दृष्टीने ही दिलासादायक 16 एप्रिलपासून बधितांमधील घट विशेषत्वाने दिसून येत आहे. गुरुवार 16 एप्रिल-107, शुक्रवार 17 एप्रिल-77 आणि शनिवार 18 एप्रिल रोजी 10 ने वाढ होऊन 87 अशी बाधितांची संख्या शंभराहून कमी राहिली आहे. कोरोनामुक्तांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. १५ एप्रिल-१७, १६ एप्रिल-२१ आणि 17 एप्रिल रोजी 37 आणि 18 एप्रिल रोजी 42 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज घडीला बाधित रुग्ण 2509 असले तरी 281 बरे होऊन घरी गेले आहेत. दुर्दैवाने 125 जणांचा मृत्यू झाला आहे.

जी दक्षिण’ वॉर्डमध्ये ‘कोरोना’बाधित रुग्णांची संख्या 389 वर पोहोचली आहे. मुंबईतील आठ वॉर्डमध्ये आतापर्यंत प्रत्येकी शंभरपेक्षा जास्त ‘कोरोना’ग्रस्त आढळले आहेत.

जी दक्षिण, ई, डी, जी उत्तर, के पश्चिम, एच पूर्व, एम पूर्व, के पूर्व आणि एल या प्रत्येक वॉर्डमध्ये किमान 100 कोरोनाबाधित आहेत.

मुंबईत आढळलेल्या 2509 ‘कोरोना’ग्रस्तांपैकी सर्वाधिक ‘जी दक्षिण’मध्ये आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने येथील आकडेवारी सर्वाधिक राहिली आहे.

अतिगंभीर वॉर्ड

जी दक्षिण (वरळी, लोअर परळ, करी रोड) – 389

ई (भायखळा, रे रोड, सुखलाजी स्ट्रीट, वाडीबंदर)– 194

डी (मलबार हिल, वाळकेश्वर, ग्रँट रोड, ब्रिच कँडी, हाजी अली) – 142

जी उत्तर (माहिम, धारावी, शिवाजी पार्क) – 142

के पश्चिम (अंधेरी, जोगेश्वरी, जुहू, वर्सोवा) – 123

एच पूर्व (वांद्रे पूर्व कलानगर, सरकारी वसाहत, खार पूर्व, सांताक्रुझ पूर्व) – 113

एम पूर्व (गोवंडी, मानखुर्द, देवनार, चेंबूर, शिवाजीनगर) – 99

के पूर्व (जोगेश्वरी पूर्व, अंधेरी पूर्व, विलेपार्ले पूर्व) – 106

एल (चुनाभट्टी, कुर्ला) – 115

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट