
प्रेस क्लब व मुख्यमंत्र्यांकडे तक्रारपोलिसांवरील अन्याया विरूद्ध आवाज उठवला म्हणून प्रसार माध्यमांना प्रहारची धमकी
- by Adarsh Maharashtra
- Apr 18, 2020
- 1173 views
विरार :लॉक डाऊन चां नियम मोडल्याबद्दल कारवाईचा दंडुका उगरणाऱ्या विरारच्या पोलिस निरीक्षक विवेक सोनवणे यांची राजकीय दबाव आणून बदली केल्याच्या घटनेला वृत्तपत्रांनी वाचा फोडतच एका व्हिडिओ द्वारे प्रसार माध्यमांना धमकावणाऱ्या प्रहारच्या विरोधात आता वसई विरार मधील सर्व पत्रकार आणि सर्वसामान्य नागरिकही एकवटले असून या प्रकरणी प्रसार माध्यमांनी राज्याचे मुख्यमंत्री, गृह मंत्री तसेच प्रेस क्लब ऑफ इंडियाला पत्र पाठवून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून प्रसारमाध्यमांना धमकावणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे
सध्या देशात लॉक डाऊन सुरू आहे आणि कोरोना सर्वत्र पसरू नये म्हणून वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी पोलिस आणि प्रसारमाध्यमांचे कर्मचारी सुधा स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करीत आहेत मोरया नगर येथील पोलिस कारवाईनंतर विवेक सोनवणे या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याची राजकीय दबाव टाकून बदली करण्यात आली हा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याने पोलिसांनी वसई विरार मधील जनतेनेही या बाबत संताप व्यक्त केला होता या संतापला दैनिक आदर्श महाराष्ट्र आणि इतर वृत्तपत्रांनी वाचा फोडली त्यामुळे आता प्रहार संघटनेने एक व्हिडिओ प्रकाशित करून प्रसारमाध्यमात आलेली बातमी खोटी असल्याचा कांगावा केला आहे तसेच आम्ही अन्याय विरूद्ध लढणारे असून हा अन्याय सहन करणार नाही जे लिहताय ते सत्य लिहा अन्यथा प्रहार जनशक्तीचे कार्यकर्ते अशा चुकीच्या गोष्टीच्या विरूद्ध उभे राहतील अशी अप्रत्यक्ष धमकीच दिली आहे अशा गोष्टी विरूद्ध उद्रेक होऊ शकतो असेही धमकावले आहे आणि पुन्हा अशा गोष्टी केल्या तर जे काही होईल मीडिया आणि सोशल मीडिया जबाबदार असेल असेही धमकावले आहे त्यामुळे व्हिडिओ याबाबतची लेखी तक्रार प्रेस क्लब ऑफ इंडिया आणि राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना करण्यात आली आहे
प्रसारमाध्यमांनी जर काही चुकीचे लिहले असेल तर त्यांनी कायदेशीर कारवाई करावी पण अशा धमकीचे व्हिडिओ बनवून प्रसारमाध्यमांना आणि सोशल मिडीयावर धमकवण्याचा प्रयत्न करू नये .आणि कोणी कितीही धमकावले तरी आम्ही घाबरणारे नाही आम्ही कायद्याच्या चौकटीत काम करणारे आहोत त्यामुळे कायदेशीर लढाई लढायला केंव्हाही तयार आहोत मात्र आजच्या संकटाच्या काळात जे कोणी जीव धोक्यात घालून कोरोना विरूद्ध लढत आहेत त्यांचा राजकीय दबावापोटी बळी घेणाऱ्यांचे विरोधात आमचीही कायदेशीर लढाई सुरूच राहील सोनावणेंच्या रातोरात झालेल्या बदलीची चौकशी व्हायलाच हवी ही आमची मागणी आहे .आणि त्यासाठी आमचाही लढा सुरूच राहील
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम