
कर्जतमधे कोरोना संकटकालात कर्जतमध्ये आदिवासींना तसेच गोरगरीबांना मोफत जेवण; बेबीताईंचे महान कार्य!
दिशा केंद्रांचे जगदीश दगडेंचा बेबीताई सौभाग्यवती!
- by Adarsh Maharashtra
- Apr 07, 2020
- 1182 views
कर्जत(धर्मानंद गायकवाड);- देशात कोरोना विषाणूंमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. या भयंकर असणाऱ्या कोरोना व्हायरस संसर्ग आजाराची लागण इतरांना होऊ नये म्हणून देशव्यापी जनता कर्फ्यूही पाळण्यात आला. तर आत्ता संपुर्ण देशासह महाराष्ट्रात संचारबंदीच्या बरोबरच लॉकडाऊन करण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. त्यामुळे गोरगरीबांचे हाल होत आहेत. असे असतानाच येथिल बेबीताई दगडे यांनी गोरगरीबांना मोफत जेवण सुरू केले आहे. त्यांचा या कार्याची सर्वत्र वाहवाह केली जात आहे.
सध्या देशात कोरोना विषाणूची महामारी शहरापासून वाड्या, पाड्यापर्यंत पोहचू नये म्हणून जिल्हाबंदी देखील करण्यात आली आहे . त्यामुळे पोलिस यंत्रणादेखील १४४ कलमाखाली संचारबंदी आदेशाची अंमलबजावणीत काटेकोरपणे करीत आहेत. परीणामी कामगार व कर्मचारी देखील घरीच बसून सुरक्षा कवचात आहेत . विशेष म्हणजे कर्जत तालुका हा बहुसंख्य आदिवासी लोकसंख्या अधिक असलेला भाग आहे . येथे सकाळपासून संध्याकाळपर्यंत मोलमजुरी केल्यावर किंवा लाकूड फाटा आणि रानमेवा विकून हातावर मिळणाऱ्या रोजगारातून कुटुंबाचा उदारनिर्वाह करण्याचा आदिवासी बांधवांचा वर्षेनुवर्षे दिनक्रम आहे. मात्र सध्या या जीवनाला अचानक कलाटणी मिळाली आहे. तसेच गाठीशी काहीच पैसे शिल्लक नसल्याने कोरोना विषाणूंशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती कशी व कोठून शरीरात येणार? याच विवंचनेतही हा वर्ग आहे.
कर्जत तालुक्यांतील आदिवासी बांधवांचा रोजगार बंद,जेवायला अन्न नाही, अशी बिकट परिस्थिती त्यांच्यावर येऊन ठेपली असतानाच कर्जत मधील बेबीताई सारखी देवासारखी माणसे त्यांच्या मदतीला धावून येताना दिसत आहेत. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, या उक्ती प्रमाणे स्वतापासून सुरुवात करणाऱ्या सौ . बेबीताई जगदीश दगडे यांच्यासारख्या माऊलीने आदिवासी व गोर गरीब वर्गाची पोटाची खळगी भरण्यासाठी मोफत जेवणाची सेवा चालू केले आहे. बेबीताईंचे हे काम महान असून अशीच सेवा इतरांनीही आपल्या परिसरात शासनाचे नियम पाळून करण्याची गरज येऊन ठेपली आसल्याचे कर्जत शहरात बोलले जात आहे. त्यांचा शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पोटाची खळगी भरणे गरजेचे आहे. येथिल आदिवासी बांधवांना जेवणाची सोय करणाऱ्या सौ. बेबीताई व त्यांचे पती पत्रकार जगदीश दगडे या दांपत्याचे कार्य अनमोल आहे. शासनाचे कोरोनाबाबत नियम पाळत रोज ६० ते ७० आदिवासी बांधव तसेच महिला वर्ग व त्यांची लहान मुले, गोर गरीब, अनाथ भिकारी वर्ग त्यांचाकडे रोज जेवून जात आहेत . हे मोफत जेवण दि . २३ मार्च पासून त्यांनी अविरत चालू केलेले आहे .
दरम्यान कर्जत दिशा केंद्र या सामाजिक संस्थेत काम करणारे जगदीश दगडे यांचे काम आदिवासी वर्गात मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हा वर्ग कसा जगतो याचा पूर्व अभ्यास त्यांना आहे. नेहमीच आदिवासी वर्गाला त्यांचा मदतीचा हात असल्याने त्यांच्या खांद्याला-खांदा लावून त्यांच्या पत्नी सौ. बेबीताई काम करत असतानाच सध्याची परिस्थिती पाहून दगडे दाम्पत्यास हे अनमोल कार्य करण्याची कल्पना सुचली आहे. त्यांच्या या महान कार्याचे संपुर्ण कर्जतसह रायगडात सर्वत्र कौतुक होत आहे. आदिवासी बांधवांची पोटाची खळगी भरणाऱ्या या माउलीच्या महान कार्याला अनेकांनी सलाम केला आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम